शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

भंगार वाहनांमुळे जागा व्यापली चंद्रपूर : चंद्रपूर शहर तसेच रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने जप्त करून ठेवण्यात ...

भंगार वाहनांमुळे जागा व्यापली

चंद्रपूर : चंद्रपूर शहर तसेच रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने जप्त करून ठेवण्यात आले आहे. मात्र या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यावसायिकांना हवे ओटे

चंद्रपूर : येथील वडगाव परसरातील काही रस्त्यावर शेजारील गावातून येणारे शेतकरी भाजीपाला विक्री करतात. मात्र त्यांना बसण्यासाठी योग्य जागाच नाही. परिणामी ते रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून ओटे तयार करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

गोल बाजारातील अतिक्रम हटवावे

चंद्रपूर : येथील गोल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजारातील व्यावसायिकांचे अतिकमण हटवून रस्त्ये मोकळे करणे गरजेचे आहे.

अंचलेश्वर गेटची डागडुजी करावी

चंद्रपूर : येथील अंंचलेश्वर गेट तसेच परिसराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने लक्ष देवून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली आहे.

एटीएम केंद्रात कचराचंद्रपूर : शहरात विविध बॅंकांनी एटीएम केंद्र सुरु केले आहे. काही एटीएमची नियमित स्वच्छता होत असली तरी काही केंद्रात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळत आहे. त्यामुळे या केंद्राची नियमित तपासणी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

रामनगर येथील अतिक्रमण हटवावे

चंद्रपूर : सेटं मायकल हायस्कूल ते वरोरा नाकाकडे येणाऱ्या रस्त्याचे नव्यानेच रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ताच बळकावला आहे. परिणामी वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.

सौंदर्यीकरण त्वरित करावे

चंद्रपूर : शहरातील काही चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून काही चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरुच आहे. त्यामुळे या चौकांचेही काम त्वरित करावे, अशी मागणी केली जात आहे.

वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी

चंद्रपूर : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

घरमालकांना पट्टे द्यावे

चंद्रपूर : शहरात अनेक भागामध्ये नागरिक नझुलच्या जागेवर अतिक्रमण करून रहात आहे. या नागरिकांना नियमित पट्टे देऊन त्याचा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे.