शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

रोहयोतून होणार १२६ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:33 IST

शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकार : ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मिती अपेक्षित

मंगेश भांडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हाभरात १२६.९० लाखांची रोहयोची कामे प्रस्तावित केली आहेत. यांमुळे ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मितीची अपेक्षा आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत ‘मागेल त्याला काम’ देण्याची शासनाची योजना आहे. नोंदणीकृत रोहयो मजुरांना वर्षभरात शंभर दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के ग्रामपंचायतस्तर व ५० टक्के यंत्रणास्तरावरील पुरवणी नियोजन आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. पंचायत समिती पोंभूर्णा व नागभीडने आपल्या रोहयो कामांचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर केला होता. या दोन्ही पंचायत समित्यांनी आपल्या तालुक्यात १२ हजार ६६३ रोहयोची कामे प्रस्तावित करून त्याकरिता ५५२५.५२ अकुशल तर ३६८३.६८ कुशल असे ९२०९.२१ लाख खर्च अपेक्षित असलेले २८.६६ लाख मनुष्यदिन निर्मितीची कामे सादर केली आहे.तर जिल्हाधिकाºयांनी चंद्रपूर, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना, राजुरा, मूल तालुक्यात विविध यंत्रणेमार्फत १९९४ कामांचे पुरवणी नियोजन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश दिले. या कामांच्या अकुशल बाबींवर २४९६.२५ तर ९८४.७६ कुशल, असे ३४८१.४१ लाख रुपये खर्च अपेक्षित असून १३.१८ लाख मनुष्यदिन निर्मिती होणार अशी अपेक्षा आहे.सर्व तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायतमार्फत कृषी विभाग, वन विभागातंर्गत मजगी, रोपवाटीका, जलसंधारण, वृक्षलागवड, वनीकरण, रस्ता दुतर्फा व रोपवाटिका लागवड, मिश्र रोपवन आदी १४ हजार ६५७ कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. या सर्व कामांना ५० टक्के यंत्रणा व ५० टक्के ग्रामपंचायतस्तर अशा नियोजन आराखड्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रोहयोंतर्गत ही सर्व कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण बेरोजगार नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य हवेचंद्रपूर जिल्ह्यात अनेक बड्या कंपन्यांचे उद्योग स्थापन आहेत. या उद्योगांमुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र या उद्योगांमध्ये काम करणारे मजूर स्थानिक कमी आणि परप्रांतीय जास्त असल्याने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत आहे. शेती हंगाम सोडला, तर मजुरांना काम मिळत नाही. रोहयोची कामे दिलासा देणारी असली तरी स्थानिक उद्योगांमध्ये बारमाही कामे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.