शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रोहयोतून होणार १२६ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:33 IST

शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकार : ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मिती अपेक्षित

मंगेश भांडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हाभरात १२६.९० लाखांची रोहयोची कामे प्रस्तावित केली आहेत. यांमुळे ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मितीची अपेक्षा आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत ‘मागेल त्याला काम’ देण्याची शासनाची योजना आहे. नोंदणीकृत रोहयो मजुरांना वर्षभरात शंभर दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के ग्रामपंचायतस्तर व ५० टक्के यंत्रणास्तरावरील पुरवणी नियोजन आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. पंचायत समिती पोंभूर्णा व नागभीडने आपल्या रोहयो कामांचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर केला होता. या दोन्ही पंचायत समित्यांनी आपल्या तालुक्यात १२ हजार ६६३ रोहयोची कामे प्रस्तावित करून त्याकरिता ५५२५.५२ अकुशल तर ३६८३.६८ कुशल असे ९२०९.२१ लाख खर्च अपेक्षित असलेले २८.६६ लाख मनुष्यदिन निर्मितीची कामे सादर केली आहे.तर जिल्हाधिकाºयांनी चंद्रपूर, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना, राजुरा, मूल तालुक्यात विविध यंत्रणेमार्फत १९९४ कामांचे पुरवणी नियोजन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश दिले. या कामांच्या अकुशल बाबींवर २४९६.२५ तर ९८४.७६ कुशल, असे ३४८१.४१ लाख रुपये खर्च अपेक्षित असून १३.१८ लाख मनुष्यदिन निर्मिती होणार अशी अपेक्षा आहे.सर्व तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायतमार्फत कृषी विभाग, वन विभागातंर्गत मजगी, रोपवाटीका, जलसंधारण, वृक्षलागवड, वनीकरण, रस्ता दुतर्फा व रोपवाटिका लागवड, मिश्र रोपवन आदी १४ हजार ६५७ कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. या सर्व कामांना ५० टक्के यंत्रणा व ५० टक्के ग्रामपंचायतस्तर अशा नियोजन आराखड्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रोहयोंतर्गत ही सर्व कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण बेरोजगार नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य हवेचंद्रपूर जिल्ह्यात अनेक बड्या कंपन्यांचे उद्योग स्थापन आहेत. या उद्योगांमुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र या उद्योगांमध्ये काम करणारे मजूर स्थानिक कमी आणि परप्रांतीय जास्त असल्याने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत आहे. शेती हंगाम सोडला, तर मजुरांना काम मिळत नाही. रोहयोची कामे दिलासा देणारी असली तरी स्थानिक उद्योगांमध्ये बारमाही कामे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.