शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

महिला स्वाधारगृह बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:50 IST

केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देस्वखर्चातून चालविण्याचा खटाटोप : तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा

नारद प्रसाद ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्वाधार गृह आहेत. यामध्ये चंद्रपूर येथील क्रिष्णानगरात सरस्वती शिक्षण मंडळ संचालित स्त्री स्वाधार गृह, गोपालपुरी येथे स्नेह स्वाधारगृह व ब्रह्मपुरी येथे राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वाधार गृह आहे.यामध्ये घटस्फोटीता, हुंडाबळी, कुमारी माता, निराधार, समस्याग्रस्त, विधवा, देवदासी, मानसिक रुग्ण असलेल्या १८ ते ४५ वर्यापर्यंतच्या महिलांना ठेवले जातात. हे स्वाधारगृह अनुदानाविना अडचणीत आले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाचे अधिकारी व्ही.के. मरसाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थांचा मूल्यांकन अहवाल शासनाला पाठविला आहे. या अनुषंगाने येत्या २४ आॅगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये याबाबत काही निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.राज्य शासन करणार मुल्यांकनस्त्री आधार केंद्राला केंद्र सरकारकडून पूर्ण अनुदान मिळत होते. परंतु २०१५-१६ पासून केंद्राने ६० टक्के अनुदान देणे सुरू केले. ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागते. केंद्र सरकारने आपला वाटा दिलेला आहे. मात्र राज्य सरकारने आता स्वाधार केंद्राचे मूल्यांकन करणे सुरू केले आहे. मुल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पात्र संस्थांना योग्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण अधिकारी व्ही. के. मरसाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आश्रम चालविण्यात मोठी अडचण - खोब्रागडेगेल्या तीन वर्षांपासून अनुदान मिळत न मिळाल्यामुळे स्वत:च्या पैशातून आश्रम चालवत आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त धान्यसुद्धा मिळणे बंद आहे. अशा परिस्थितीत स्वाधार गृह चालविणे कठीण झाले असल्याची माहिती मागील २५ वर्षांपासून ब्रह्मपुरीत स्वाधार गृह चालवित असलेल्या संस्थेच्या सचिव सरिता खोब्रागडे यांनी दिली.बिकट प्रश्न उभा आहे - पोटदुखेस्नेह स्वच्छ गोर गोपालपुरीच्या संचालक शोभा पोटदुखे म्हणाल्या, ७ कर्मचारी आणि ३० महिला आहेत. सरकारने तीन वर्षांपासून अनुदान अडवून ठेवले आहे. राज्य सरकारने अनुदान दिले नाही. अनुदान मिळत नसल्यामुळे स्वाधार गृह कसे चालवायचे हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.