शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महिला स्वाधारगृह बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:50 IST

केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देस्वखर्चातून चालविण्याचा खटाटोप : तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा

नारद प्रसाद ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्वाधार गृह आहेत. यामध्ये चंद्रपूर येथील क्रिष्णानगरात सरस्वती शिक्षण मंडळ संचालित स्त्री स्वाधार गृह, गोपालपुरी येथे स्नेह स्वाधारगृह व ब्रह्मपुरी येथे राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वाधार गृह आहे.यामध्ये घटस्फोटीता, हुंडाबळी, कुमारी माता, निराधार, समस्याग्रस्त, विधवा, देवदासी, मानसिक रुग्ण असलेल्या १८ ते ४५ वर्यापर्यंतच्या महिलांना ठेवले जातात. हे स्वाधारगृह अनुदानाविना अडचणीत आले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाचे अधिकारी व्ही.के. मरसाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थांचा मूल्यांकन अहवाल शासनाला पाठविला आहे. या अनुषंगाने येत्या २४ आॅगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये याबाबत काही निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.राज्य शासन करणार मुल्यांकनस्त्री आधार केंद्राला केंद्र सरकारकडून पूर्ण अनुदान मिळत होते. परंतु २०१५-१६ पासून केंद्राने ६० टक्के अनुदान देणे सुरू केले. ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागते. केंद्र सरकारने आपला वाटा दिलेला आहे. मात्र राज्य सरकारने आता स्वाधार केंद्राचे मूल्यांकन करणे सुरू केले आहे. मुल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पात्र संस्थांना योग्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण अधिकारी व्ही. के. मरसाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आश्रम चालविण्यात मोठी अडचण - खोब्रागडेगेल्या तीन वर्षांपासून अनुदान मिळत न मिळाल्यामुळे स्वत:च्या पैशातून आश्रम चालवत आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त धान्यसुद्धा मिळणे बंद आहे. अशा परिस्थितीत स्वाधार गृह चालविणे कठीण झाले असल्याची माहिती मागील २५ वर्षांपासून ब्रह्मपुरीत स्वाधार गृह चालवित असलेल्या संस्थेच्या सचिव सरिता खोब्रागडे यांनी दिली.बिकट प्रश्न उभा आहे - पोटदुखेस्नेह स्वच्छ गोर गोपालपुरीच्या संचालक शोभा पोटदुखे म्हणाल्या, ७ कर्मचारी आणि ३० महिला आहेत. सरकारने तीन वर्षांपासून अनुदान अडवून ठेवले आहे. राज्य सरकारने अनुदान दिले नाही. अनुदान मिळत नसल्यामुळे स्वाधार गृह कसे चालवायचे हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.