शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महिला स्वाधारगृह बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:50 IST

केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

ठळक मुद्देस्वखर्चातून चालविण्याचा खटाटोप : तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा

नारद प्रसाद ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्वाधार गृह आहेत. यामध्ये चंद्रपूर येथील क्रिष्णानगरात सरस्वती शिक्षण मंडळ संचालित स्त्री स्वाधार गृह, गोपालपुरी येथे स्नेह स्वाधारगृह व ब्रह्मपुरी येथे राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वाधार गृह आहे.यामध्ये घटस्फोटीता, हुंडाबळी, कुमारी माता, निराधार, समस्याग्रस्त, विधवा, देवदासी, मानसिक रुग्ण असलेल्या १८ ते ४५ वर्यापर्यंतच्या महिलांना ठेवले जातात. हे स्वाधारगृह अनुदानाविना अडचणीत आले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाचे अधिकारी व्ही.के. मरसाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थांचा मूल्यांकन अहवाल शासनाला पाठविला आहे. या अनुषंगाने येत्या २४ आॅगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये याबाबत काही निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.राज्य शासन करणार मुल्यांकनस्त्री आधार केंद्राला केंद्र सरकारकडून पूर्ण अनुदान मिळत होते. परंतु २०१५-१६ पासून केंद्राने ६० टक्के अनुदान देणे सुरू केले. ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागते. केंद्र सरकारने आपला वाटा दिलेला आहे. मात्र राज्य सरकारने आता स्वाधार केंद्राचे मूल्यांकन करणे सुरू केले आहे. मुल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पात्र संस्थांना योग्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण अधिकारी व्ही. के. मरसाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आश्रम चालविण्यात मोठी अडचण - खोब्रागडेगेल्या तीन वर्षांपासून अनुदान मिळत न मिळाल्यामुळे स्वत:च्या पैशातून आश्रम चालवत आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त धान्यसुद्धा मिळणे बंद आहे. अशा परिस्थितीत स्वाधार गृह चालविणे कठीण झाले असल्याची माहिती मागील २५ वर्षांपासून ब्रह्मपुरीत स्वाधार गृह चालवित असलेल्या संस्थेच्या सचिव सरिता खोब्रागडे यांनी दिली.बिकट प्रश्न उभा आहे - पोटदुखेस्नेह स्वच्छ गोर गोपालपुरीच्या संचालक शोभा पोटदुखे म्हणाल्या, ७ कर्मचारी आणि ३० महिला आहेत. सरकारने तीन वर्षांपासून अनुदान अडवून ठेवले आहे. राज्य सरकारने अनुदान दिले नाही. अनुदान मिळत नसल्यामुळे स्वाधार गृह कसे चालवायचे हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.