शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हंसराज अहीर यांच्या शिवार संवादाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 30, 2017 00:34 IST

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

दमपूर मोहदा : शाश्वत विकास व शेतीपूरक योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्थानलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे. शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी कल्याणकारी व महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रयत्न असल्याने शेतकऱ्यांनी हताश न होता या योजनांचा लाभ घेवून विकास करावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.ना. अहीर जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा या अतिदुर्गम व पहाडी गावातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद कार्यक्रमात बोलत होते.दुर्गम भागातील दमपूर मोहदा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर शिवार संवादाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी वार्तालाप करणार असल्याची माहिती मिळताच या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी ना. अहीर यांच्या शेतकरी विषयक भूमिकेची तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. ना. अहीर यांनी दमपूर मोहदा या गावास शिवार संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भेट देवून शेतकऱ्यांच्या विविधांगी समस्या व अडचणी जाणून घेतल्या.चंद्रपूर जिल्हा सिंचन समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोट्यवधी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांच्या माध्यमातून खर्ची घालण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना पारंपारीक शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून भाजीपाला, मधुमक्षीका पालन, मत्स्य व्यवसाय व फलोत्पादनासारख्या पिकांचे उत्पादन घेण्याकरिता उद्युक्त केले जात आहे. काही तालुक्यांमध्ये शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली असल्याचे सांगत ना. अहीर यांनी दमपूर मोहदा येथे उपस्थित शेतकऱ्यांना पुरक व्यवसायाला स्वीकारण्याचे आवाहन केले.त्यांच्या या संवाद भेटीदरम्यान राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपचे उपमहापौर अनिल फुलझेले, अरूण मस्की, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, जि.प. च्या सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, सुरेश केंद्रे, दत्ता राठोड, मनोहर कुळसंगे, अशोक सोनी व गावातील पुरूष व महिला शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अंतिम उपाय नव्हेना. अहीर यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती देणे हा अंतिम उपाय नसून शेतकऱ्यांना बँका, पतसंस्था व सावकारी कर्ज घेण्यापासून कसे मुक्त करता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाचे धोरणात्मक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांत शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीचे प्रयत्न न झाल्याने, सिंचनाबाबत नियोजनशून्यता व चुका झाल्याने आज शेतकरी आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणाला तोंड देत आहे. या चुकांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना नेमके आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने समृद्ध करता येईल. केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत विकास व शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असल्याने नजीकच्या काळात शेतकरी आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.