शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

हंसराज अहीर यांच्या शिवार संवादाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 30, 2017 00:34 IST

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

दमपूर मोहदा : शाश्वत विकास व शेतीपूरक योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्थानलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे. शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी कल्याणकारी व महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रयत्न असल्याने शेतकऱ्यांनी हताश न होता या योजनांचा लाभ घेवून विकास करावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.ना. अहीर जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा या अतिदुर्गम व पहाडी गावातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद कार्यक्रमात बोलत होते.दुर्गम भागातील दमपूर मोहदा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर शिवार संवादाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी वार्तालाप करणार असल्याची माहिती मिळताच या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी ना. अहीर यांच्या शेतकरी विषयक भूमिकेची तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. ना. अहीर यांनी दमपूर मोहदा या गावास शिवार संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भेट देवून शेतकऱ्यांच्या विविधांगी समस्या व अडचणी जाणून घेतल्या.चंद्रपूर जिल्हा सिंचन समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोट्यवधी रुपये या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांच्या माध्यमातून खर्ची घालण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना पारंपारीक शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून भाजीपाला, मधुमक्षीका पालन, मत्स्य व्यवसाय व फलोत्पादनासारख्या पिकांचे उत्पादन घेण्याकरिता उद्युक्त केले जात आहे. काही तालुक्यांमध्ये शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली असल्याचे सांगत ना. अहीर यांनी दमपूर मोहदा येथे उपस्थित शेतकऱ्यांना पुरक व्यवसायाला स्वीकारण्याचे आवाहन केले.त्यांच्या या संवाद भेटीदरम्यान राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपचे उपमहापौर अनिल फुलझेले, अरूण मस्की, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, जि.प. च्या सभापती गोदावरी केंद्रे, जिवती पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, सुरेश केंद्रे, दत्ता राठोड, मनोहर कुळसंगे, अशोक सोनी व गावातील पुरूष व महिला शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अंतिम उपाय नव्हेना. अहीर यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती देणे हा अंतिम उपाय नसून शेतकऱ्यांना बँका, पतसंस्था व सावकारी कर्ज घेण्यापासून कसे मुक्त करता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाचे धोरणात्मक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ५० वर्षांत शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीचे प्रयत्न न झाल्याने, सिंचनाबाबत नियोजनशून्यता व चुका झाल्याने आज शेतकरी आर्थिक अडचणी व कर्जबाजारीपणाला तोंड देत आहे. या चुकांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना नेमके आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने समृद्ध करता येईल. केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून शेतीचा शाश्वत विकास व शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असल्याने नजीकच्या काळात शेतकरी आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.