शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

पाण्यासाठी घुग्घुस ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: May 19, 2016 00:45 IST

येथील अमराई १ व २ वॉर्डाला पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद आहे.

घुग्घुस : येथील अमराई १ व २ वॉर्डाला पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद आहे. मात्र ही योजना पूर्ववत सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतकडून उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी दुपारी भर ऊन्हात ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. दरम्यान, सरपंच कार्यालयात गैरहजर असल्याने ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार यांना निवेदन देऊन तत्काळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. घुग्घुस कॉलरी क्र.२, जोगी प्लॉट वरील अमराई, घुग्घुस वार्ड १ व २ ला पाणी पुरवठा योजनेच्या ट्युबवेलचे अनुभवी फिटरच्या गैरहजेरीत काम करण्यात आले. त्यामुळे पंप काढताना पंपसह १८ पाईप ट्युबवेल मध्ये पडले. सदर पाईप व मोटार पंप काढण्याचे व पाणीपुरवठा योजना पुर्ववत करण्याकडे ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्या ट्युबवेलच्या दुरूस्तीकडे ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मार्च महिन्याच्या मासिक सभेत मोटारपंप खरेदीचा ठराव मंजूर झाला. मात्र अजूनही मोटारपंप खरेदी झाली नाही. पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून गावातील मुख्य पाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पाच-सहा दिवसातून मिळत होता. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने मोटार पंप खाली उतरविण्याच्या कामाकडे लक्ष न दिल्याने मंगळपासून पाणीपुरवठा ठप्प झाला. परिणामी महिलांनी बुधवारी मोर्चा काढला. (वार्ताहर)