शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डा ग्रामपंचायतीच्या विरोधात महिलांचा एल्गार

By admin | Updated: July 17, 2016 00:39 IST

शहराला लागून असणाऱ्या बोर्डा ग्राामपंचायत गेल्या एक वर्षांपासून चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

पाणी पुरवठा समितीची निवड नियमबाह्यवरोरा : शहराला लागून असणाऱ्या बोर्डा ग्राामपंचायत गेल्या एक वर्षांपासून चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील एका वर्षांपासून पाणी पुरवठा समिती गठीत झाली नाही. या वादातूनच एका सचिवाला निलंबितही व्हावे लागले. आज १६ जुलैला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत पाणी पुरवठा समितीची निवड करण्यात आली. परंतु ती नियमबाह्य असल्याचा आरोप करीत शेकडो महिलांनी निवड समितीच्या विरोधात एल्गार पुकारला.शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठून निवड प्रक्रिया नियमाबाह्य असून निवड करण्यात आलेली समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली.पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा समितीची निवड केली जाते. मात्र बोर्डा ग्रामपंचायतीत मागील एक वर्षांपासून ही निवड प्रक्रिया या ना त्या कारणामुळे व ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे रखडत आहे. अनेकदा यातून वादही झाले आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात तसेच गुप्त मतदान पद्धतीने व्हावी, अशी मागणी गावातील महिलांनी एका निवेदनातून संवर्ग विकास अधिकारी यांना केली होती. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीला १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने अनेक गाव पुढाऱ्याचे लक्ष ग्रामपंचायत उपसमिती व पाणी पुरवठा समितीकडे लागले आहे. त्यातूनच वाद होत आहेत. आज शनिवारी बोर्डा ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा समिती निवड करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेचा अध्यक्ष हा नागरिकांमधून निवडण्याचा नियम असतानाही उपसरपंच धनराज आसूटकर व राजू मिश्रा यांनी संगणमत करून बाहेर गावातील बोगस मतदार आसूटकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असा आरोप नागरिक करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्य किंवा पदाधिकारी यांना ग्रामसभेचे अध्यक्ष बनविता येत नसतानाही उपसरपंचांना बोगस मतदान करून केलेली ही निवड रद्द करण्याची मागणी ओम मांडवकर, यशवंत सायरे, प्रशांत डाहुले, अनिता देशट्टीवार, जितेंद्र कांबळे व शेकडो ग्रामस्थांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)