शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस; भद्रावती येथे स्त्रीमुक्ती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:41 IST

आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत.

भद्रावती(चंद्रपूर) : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. त्यामुळे महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घेऊन सर्व प्रकारची गुलामगिरी झुगारावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. भद्रावती येथे तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने पार पडलेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोनालीसा देवगडे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. मंचावर स्वागताध्यक्ष सीमा ढेंगळे, भारीप बमसंचे वर्धा व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, रोहीत वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला, गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, कपूर दुपारे, भामसं जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिलाध्यक्ष लता साव, सुरज गावंडे, सुनील खोब्रागडे, धीरज बांबोळे, सेवचंद्र नागदेवते, कविता गौरकर, अविंता उके, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, लता टिपले, रजनीकुंदा रायपुरे, माया देवगडे, निर्मला शिरसाट, माया महाकुलकर, राजा वेमुला, पद्मा इलन दुल्ला आदी उपस्थित होते. एकदिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेत विविध सत्रांमध्ये महिलांच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आली. महिलांच्या राजकीय व सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात  चळवळीच्या अभ्यासक तसेच कार्यकर्तींनी सम्यक मांडणी करून आंदोलनाची गरज व्यक्त केली. रजनीकुंदा रायपुरे, पौर्णिमा पाटील, सीमा ढेंगळे, लता साव, जयदीप खोब्रागडे, कुशल मेश्राम,  आदींनीही मार्गदर्शन केले. लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी ‘जन बदल घालूनी धाव’ हा संगीतमय, तर औरंगाबाद येथील लोकशाहिर मेघानंद जाधव यांनी आंबेडकरी जलसा सादर केला. संचालन राखी रामटेके व प्रास्ताविक लता टिपले यांनी केले. वैशाली चिमूरकर यांनी आभार मानले.                             

हिंदू धर्म सोडणार - राधिका वेमुलारोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला म्हणाल्या, भारताला गुलाम बनवण्यात मनुस्मृतीचा मोठा हात आहे. आपण सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी चालले पाहिजे. मनुस्मृती महिलांना गुलाम बनविते. त्यामुळे तिचे पालन का करायचे? समानता नाकारणाºया  मनुुस्मृतीचे दहन योग्यच असून, मी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.

सरकारी यंत्रणेचा गैरवापर - स्मिता पानसरेअलीकडच्या काळात सत्ताधा-यांकडून लादली जाणारी नवीन मनुस्मृती अधिक घातक आहे. पुराणमतवादी विचारांची मंडळी घटनाद्रोही राजकारण करीत आहेत. शिवाय, सत्ताधारी वर्ग सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजे, असे  मत  अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त कले.  चौदा ठराव पारितस्त्रीमुक्ती परिषदेत चौदा ठराव पारित करण्यात आले. २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, मनुस्मृतीवर बंदी घालावी, त्याचा पुरस्कार करणे कायद्यानुसार गुन्हा ठरवावा, स्वयंघोषित गोरक्षकांवर कडक कारवाई करावी, अंगणवाडीतार्इंच्या मानधनात वाढ करावी आदींसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.