शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस; भद्रावती येथे स्त्रीमुक्ती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 17:41 IST

आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत.

भद्रावती(चंद्रपूर) : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. त्यामुळे महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घेऊन सर्व प्रकारची गुलामगिरी झुगारावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. भद्रावती येथे तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने पार पडलेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोनालीसा देवगडे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. मंचावर स्वागताध्यक्ष सीमा ढेंगळे, भारीप बमसंचे वर्धा व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, रोहीत वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला, गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, कपूर दुपारे, भामसं जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिलाध्यक्ष लता साव, सुरज गावंडे, सुनील खोब्रागडे, धीरज बांबोळे, सेवचंद्र नागदेवते, कविता गौरकर, अविंता उके, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, लता टिपले, रजनीकुंदा रायपुरे, माया देवगडे, निर्मला शिरसाट, माया महाकुलकर, राजा वेमुला, पद्मा इलन दुल्ला आदी उपस्थित होते. एकदिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेत विविध सत्रांमध्ये महिलांच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आली. महिलांच्या राजकीय व सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात  चळवळीच्या अभ्यासक तसेच कार्यकर्तींनी सम्यक मांडणी करून आंदोलनाची गरज व्यक्त केली. रजनीकुंदा रायपुरे, पौर्णिमा पाटील, सीमा ढेंगळे, लता साव, जयदीप खोब्रागडे, कुशल मेश्राम,  आदींनीही मार्गदर्शन केले. लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी ‘जन बदल घालूनी धाव’ हा संगीतमय, तर औरंगाबाद येथील लोकशाहिर मेघानंद जाधव यांनी आंबेडकरी जलसा सादर केला. संचालन राखी रामटेके व प्रास्ताविक लता टिपले यांनी केले. वैशाली चिमूरकर यांनी आभार मानले.                             

हिंदू धर्म सोडणार - राधिका वेमुलारोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला म्हणाल्या, भारताला गुलाम बनवण्यात मनुस्मृतीचा मोठा हात आहे. आपण सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी चालले पाहिजे. मनुस्मृती महिलांना गुलाम बनविते. त्यामुळे तिचे पालन का करायचे? समानता नाकारणाºया  मनुुस्मृतीचे दहन योग्यच असून, मी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.

सरकारी यंत्रणेचा गैरवापर - स्मिता पानसरेअलीकडच्या काळात सत्ताधा-यांकडून लादली जाणारी नवीन मनुस्मृती अधिक घातक आहे. पुराणमतवादी विचारांची मंडळी घटनाद्रोही राजकारण करीत आहेत. शिवाय, सत्ताधारी वर्ग सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजे, असे  मत  अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त कले.  चौदा ठराव पारितस्त्रीमुक्ती परिषदेत चौदा ठराव पारित करण्यात आले. २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, मनुस्मृतीवर बंदी घालावी, त्याचा पुरस्कार करणे कायद्यानुसार गुन्हा ठरवावा, स्वयंघोषित गोरक्षकांवर कडक कारवाई करावी, अंगणवाडीतार्इंच्या मानधनात वाढ करावी आदींसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.