शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात महिला असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST

चंद्रपूर : ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील दोन वर्षात ...

चंद्रपूर : ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात बलात्काराच्या २१० घटना घडल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर बऱ्याच प्रकरणामध्ये आप्तस्वकीयांनी बलात्कार केल्याची तक्रार आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

२१ व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर पोहचल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र आजच्या घडीला स्त्री ही ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही सुरक्षित नाही. रात्रीच्या वेळी कुठे एखादी मुलगी किंवा महिला आढळली तर तिची छेडछाड, विनयभंग, वाईट नजरांना सामोरे जावे लागत असल्याची घटना दर आठवड्याला कुठे ना कुठे तरी समोर येत असते. मुलींनी स्वसंरक्षण करण्यास शिकावे, समाजात वावरताना समोरच्या व्यक्तीला ओळखण्यास शिकावे, असा सल्ला अनेकांकडून देण्यात येतो. परंतु, आप्तस्वकीयांकडून अत्याचाराच्या घटना घडत असल्याने कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आहे. अनेक नराधम कोवळ्या कळीलाही आपल्या वासनेचा शिकार बनवीत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ९५ तर २०२० मध्ये ११५ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद घडली. त्यामुळे मुलींना ‘सातच्या आत घरात’ ही पालकांची किंवा आधुनिक समाजाची मनस्थिती नसून काळजी व भीती आहे.

बॉक्स

विनयभंगाच्या ४७७ तक्रारी

मागील दोन वर्षात जिल्ह्यात विनयभंगाच्या ४७७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सन २०१९ मध्ये २२७ तर २०२० मध्ये २५० तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिवसेंदिवस या आकडेवारीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुली व महिलांना घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.

बॉक्स

बदनामीच्या भीतीने दडपली जाते तीव्रता

विनयभंग, छेडछाड, टाॅन्टिंग आदी प्रकारांना महिला व मुलींना सामोरे जावे लागते. मात्र बदनामी होईल या भीतीने महिला तक्रार देत नाही. मात्र त्यामुळे अशा नराधमाची हिंमत वाढत जाते. त्यामुळे अशा घटना वाढत आहेत. अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी महिलांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.