शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घ्यावी

By admin | Updated: September 17, 2015 00:55 IST

राष्ट्रवादीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबत युवती आणि महिलांना...

चित्रा वाघ यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावाचंद्रपूर : राष्ट्रवादीने महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले असून आरोग्य सुविधांसोबत युवती आणि महिलांना रोजगाराच्या संधी मिळण्याबाबत जागृती करण्यासाठी धोरण आखलेले आहे. महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रगती पाटील, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, शहर जिल्हाध्यक्ष शशी देशकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, ज्येष्ठ नेत्या शोभा पोटदुखे, माजी जिल्हाध्यक्ष हेमलता पाजनकर, विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे, डी.के. आरीकर यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे आकडे बघता महिलांनी एकजुटीने अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावे व विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि पोलीस विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारला निवेदने देऊन न्याय मिळणार नसेल तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरुन असंवेदनशील सरकारच्या विरोधात संघर्षपूर्ण आंदोलन करणार असल्याची माहिती वाघ यांनी यावेळी दिली.यावेळी राजेंद्र वैद्य तसेच इतरही पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाभरातील जवळपास १०० महिलांनी रॉकामध्ये प्रवेश घेतला. संचालन शहर जिल्हा अध्यक्ष ज्योती रंगारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शन इंगळे, अमित उमरे, संजय वैद्य, नीलेश ताजने, देव कन्नाके, माधुरी येरणे, महानंदा वाळके, अश्विनी गुरमे, विजयालक्ष्मी डोहे, शांता मोतेवाड, वनिता कुंटावार, संगीता आगलावे, सुनीता नरडे, संचिता मेश्राम, जीवनकला आलाम यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)