शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

वादात अडकल्या पोषण आहार शिजविणाऱ्या महिला

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या.

चंद्रपूर: जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या. मात्र शासनाने एक आदेश काढून सदर महिलांना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांना काढून टाकण्यात आले. मात्र पुन्हा शासनाने निर्णय बदलविण्यानंतर जुन्याच महिलांना काम देण्याचे ठरल्यानंतरही आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांना महिलांना घेण्याचे आदेश दिले आहे. असे असताना जिल्ह्यातील १५० महिलांना अद्यापही कामावर घेण्यात आले नाही. मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वादात या महिलांना कामापासून वंचित ठेवल्या जात आहे. या विरोधात ६० महिलांनी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, कुपोषणाचे प्रमाण घटावे यासाठी शासनाने शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरु केली. यानंतर शासनाने गावातील महिलांना पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना अत्यल्प मानधन देण्यात येते. २००२ पासून सुरु झालेल्या या योजनेमध्ये गावागावांतील अनेक महिला जुळल्या. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये शासनाने एक आदेश काढला. या आदेशानंतर जिल्ह्यातील काही शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना कामावरून कमी करण्यात आले. कामावरून काढल्याने अनेक महिलांचा रोजगार हिरावला. त्यानंतर महिलांनी शासनाला निवेदन सादर करून कामावर घेण्याची मागणी केली. त्यानंतर शासनाने १० जुलैला नव्याने आदेश काढून जुन्याच महिलांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्र्यपालन अधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी, तसेच मुख्याध्यापकांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे बजावले. यानंतर काही शाळांमध्ये जुन्या महिलांना कामावर घेण्यात आले. मात्र बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वादात आजही महिलांना कामावर घेतले नाही.शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आणि मदतनीसांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. (नगर प्रतिनिधी)'