शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वादात अडकल्या पोषण आहार शिजविणाऱ्या महिला

By admin | Updated: December 2, 2014 23:03 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या.

चंद्रपूर: जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी खासगी महिलांकडे देण्यात आली आहे. २००२ पासून शाळेमध्ये महिला शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करीत होत्या. मात्र शासनाने एक आदेश काढून सदर महिलांना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिलांना काढून टाकण्यात आले. मात्र पुन्हा शासनाने निर्णय बदलविण्यानंतर जुन्याच महिलांना काम देण्याचे ठरल्यानंतरही आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापकांना महिलांना घेण्याचे आदेश दिले आहे. असे असताना जिल्ह्यातील १५० महिलांना अद्यापही कामावर घेण्यात आले नाही. मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वादात या महिलांना कामापासून वंचित ठेवल्या जात आहे. या विरोधात ६० महिलांनी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, कुपोषणाचे प्रमाण घटावे यासाठी शासनाने शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरु केली. यानंतर शासनाने गावातील महिलांना पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना अत्यल्प मानधन देण्यात येते. २००२ पासून सुरु झालेल्या या योजनेमध्ये गावागावांतील अनेक महिला जुळल्या. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१४ मध्ये शासनाने एक आदेश काढला. या आदेशानंतर जिल्ह्यातील काही शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना कामावरून कमी करण्यात आले. कामावरून काढल्याने अनेक महिलांचा रोजगार हिरावला. त्यानंतर महिलांनी शासनाला निवेदन सादर करून कामावर घेण्याची मागणी केली. त्यानंतर शासनाने १० जुलैला नव्याने आदेश काढून जुन्याच महिलांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्र्यपालन अधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी, तसेच मुख्याध्यापकांना आदेशाची अंमलबजावणी करण्याचे बजावले. यानंतर काही शाळांमध्ये जुन्या महिलांना कामावर घेण्यात आले. मात्र बऱ्याच ठिकाणी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वादात आजही महिलांना कामावर घेतले नाही.शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आणि मदतनीसांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. (नगर प्रतिनिधी)'