शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष

By admin | Updated: June 13, 2016 02:34 IST

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला.

सुनील येरमे यांचे प्रतिपादन : बाबुपेठ येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमचंद्रपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला. त्यांनी अवघे २५ वर्षे वय असताना इंग्रजांविरोधात बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले. ब्रिटिशांविरोधात क्रांती पेटविण्याचे काम बिरसा यांनी केले. १८९० मध्ये बिरसा यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र संघटना उभी करून क्रांतीचा वणवा बिहारभर पसरविला. त्यामुळे ब्रिटिशांना तेथे काम करणे अडचणीचे झाले होते, त्यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील येरमे यांनी केले. बाबुपेठ येथे गुरूवारी आयोजित बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बिरसांनी एका जाहीर सभेत कुऱ्हाडीने आपला हात कापला आणि आपल्या रक्तानी उपस्थिती आदिवासींच्या कपाळावर टिळा लावून आपल्या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, महिलावरील अत्याचाराचा बीमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन दिले. तरुण वयातच बिरसामध्ये असलेल्या धाडसाला इतिहास साक्ष आहे, असे ते म्हणाले. तंट्याभिल्ल आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था बाबूपेठच्या वतीने गुरुवारी बिरसा मुंडा चौक बाबूपेठ येथे बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश गेडाम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ कन्नाके, तुळसीदास ताडाम, दयालाल कन्नाके, डॉ. देव कन्नाके, अशोक आक्केवार आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात रांची येथून बिरसा यांच्या समाधीवरील आणलेल्या मातीवर वृक्षारोेपण करण्यात आले. या स्थळाला श्रद्धास्थान संबोधण्यात आले. प्रास्ताविक अशोक आक्केवार तर आभार गणेश सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता पोरटे, संतोेष सिडाम, नर्मदा सिडाम, गीता मडावी, माणिक आत्राम, सिडाम आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)