शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष

By admin | Updated: June 13, 2016 02:34 IST

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला.

सुनील येरमे यांचे प्रतिपादन : बाबुपेठ येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमचंद्रपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला. त्यांनी अवघे २५ वर्षे वय असताना इंग्रजांविरोधात बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले. ब्रिटिशांविरोधात क्रांती पेटविण्याचे काम बिरसा यांनी केले. १८९० मध्ये बिरसा यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र संघटना उभी करून क्रांतीचा वणवा बिहारभर पसरविला. त्यामुळे ब्रिटिशांना तेथे काम करणे अडचणीचे झाले होते, त्यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील येरमे यांनी केले. बाबुपेठ येथे गुरूवारी आयोजित बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बिरसांनी एका जाहीर सभेत कुऱ्हाडीने आपला हात कापला आणि आपल्या रक्तानी उपस्थिती आदिवासींच्या कपाळावर टिळा लावून आपल्या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, महिलावरील अत्याचाराचा बीमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन दिले. तरुण वयातच बिरसामध्ये असलेल्या धाडसाला इतिहास साक्ष आहे, असे ते म्हणाले. तंट्याभिल्ल आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था बाबूपेठच्या वतीने गुरुवारी बिरसा मुंडा चौक बाबूपेठ येथे बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश गेडाम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ कन्नाके, तुळसीदास ताडाम, दयालाल कन्नाके, डॉ. देव कन्नाके, अशोक आक्केवार आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात रांची येथून बिरसा यांच्या समाधीवरील आणलेल्या मातीवर वृक्षारोेपण करण्यात आले. या स्थळाला श्रद्धास्थान संबोधण्यात आले. प्रास्ताविक अशोक आक्केवार तर आभार गणेश सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता पोरटे, संतोेष सिडाम, नर्मदा सिडाम, गीता मडावी, माणिक आत्राम, सिडाम आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)