शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सुरक्षा साहित्याविना कोळसा खाणीतील कामगारांचे कामच धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:24 IST

जिवाला धोका : केपीसीएल कंपनीचे कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : तालुक्यातील कर्नाटक एम्टा, केपीसीएल खुल्या कोळसा खाणीतील कामगारांनी आपल्या सुरक्षा साहित्यासह काही इतर मागण्या घेऊन ४ ऑक्टोबर रोजी कंपनीचे काम बंद पाडून आंदोलन केले. यावर कंपनीने ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोडगा काढू, असे म्हणून आंदोलन दडपले. मात्र, अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यांना सुरक्षा साहित्याविनाच काम करावे लागत आहे.

यामुळे केपीसीएल कामगारांमधून संताप व्यक्त केला जात असून, ते आता सुरक्षा साहित्य खरेदी करण्यासाठी भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन कामगारांनी उपमहानिर्देशक डीजीएमएस कार्यालय, नागपूर यांना दिले आहे. 

केपीसीएल कंपनीचे २०२० पासून कोळसा उत्खनन पुन्हा चालू झाले आहे. कंपनीमध्ये स्थायी कामगार २००, कंत्राटी ४०० कामगार कार्यरत आहेत कोळसा उत्खननाचे कार्य करत असताना कामगारांना नियमानुसार सुरक्षा साहित्य जसे हेल्मेट, सेफ्टी शूज, रिफ्लेक्टर जॅकेटसह इतर साहित्य दिले जाते. ते आवश्यकही आहे. मात्र, कंपनीने चार वर्षांपासून या कामगारांना सुरक्षा साहित्य दिलेच नाही. हे कामगार जीव मुठीत घेऊन कोळसा उत्खननाचे काम करत आहेत. यामुळे त्यांच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. असा प्रकार कोळसा खाण क्षेत्रात पहिल्यांदाच केला जात आहे. साधे कामगारांना सुरक्षा उपकरण पुरवले जात नाही तर कामगारांच्या इतर मागण्यांचे काय होत असेल, हे कळून येते. 

११ दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा भीक मागून घेणार साहित्य २२ दिवसात केपीसीएल कंपनीने कामगारांच्या मागण्या मान्य करत सुरक्षा साहित्य पुरवले नाही तर भद्रावती परिसरात भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपमहानिर्देशक डीजेएमएस नागपूर यांना अरविंद देवगडे यांनी २०० कामगारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पाठवले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर