शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुक्यातील पोचमार्ग डांबरीकरणाविना

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले.

रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले. यामध्ये मुरुम गिट्टी टाकून रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र अनेक वर्ष लोटूनही डांबरीकरण न झाल्याने गिट्टी उघडी पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील चनई-धनकदेवी, शरज-हेटी, कोरपना-पारडी, जेव्हरा-गांधीनगर, कोरपना-कातलाबोडी, बोरगाव-कातलाबोडी, पिपर्डा-कारगाव, हातलोणी-कोरपना, कोडशी-तुळशी-कोरपना, भिप्पा- मांगलहिरा, नांदाफाटा-लालगुडा, बिबी-राजुरगुडा, आवारपूर- कोलापूरगुडा-कढोली-वनोजा, बाखर्डी-निमनी-गोवरी, आवारपूर-गाडेगाव, हिरापूर-पालगाव, कवठाळा-विरूर, लखमापूर-भुटरा, धुनकी-निमनी, बाखर्डी-नांदाफाटा, नोकारी-पिंपळगाव, नांदाफाटा-आसन, भोयगाव-भारोसा, लखमापूर-कारव आदी पोचमार्ग उखडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास कठीण होत आहे. यातील अनेक पोचमार्ग शेतातून जातात. या मार्गासाठी शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आपल्या जमीनी दिल्या आहेत. तर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पोचमार्गामुळे धुळ उडत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे. मात्र, शेतातून पोचमार्ग गेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना चिखलातून जाण्याचा त्रास कमी झाला. परंतु, आता या रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. बऱ्याच पोचमार्गावर छोटे-छोटे पुल तयार करण्यात आले आहे. काही पुलाला तडे गेलेले दिसत असून या पुलांची दुरुस्ती करणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर पुलाची उंची कमी असल्याने शाळकरी मुले व शेतकऱ्यांना पावसाळ्यात खोल पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पोचमार्गावरुन एक चारचाकी वाहन जाण्याइतपत जागा राहत नाही. रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा वेध घेणे कठीण होत आहे. गिट्टी उखडल्याने दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. तालुक्यात अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड व मुर्ली अ‍ॅग्रो अशा चार सिमेंट कंपन्या आहेत. यामध्ये अनेक कामगार १० ते १५ किमी अंतरावरुन कामाला जातात. रात्रपाळीला अंतर व वेळ वाचविण्यासाठी पोचमार्गानेच प्रवास केला जातो. परंतु, रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे धोक्याचे ठरत आहे. काही लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्ता काळात गावाशी-गाव जोडता यावा या हेतुने पोचमार्ग तयार केले. यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. परंतु, डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत पोचमार्ग जैसे-थे आहेत. केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष मात्र या रस्त्यांकडे नाही आणि प्रशासनही बघ्याची भूमिका घेऊन आहे.