शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

साडेसात हजार व्यापारी जीएसटीच्या कक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:11 IST

अर्थ आणि कर प्रणालीत आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी १ जुलैपासून लागू केलेल्या जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हीस टॅक्स) अर्थात ’स्वस्तु व सेवा कर’ या नव्या करप्रणालीने उद्योग व व्यापार जगतातून प्रचंड नाराजी उफ ाळून आली होती.

ठळक मुद्देतांत्रिक सुधारणेचा परिणाम : ११७ व्यापारी अद्याप नोंदणीविना

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अर्थ आणि कर प्रणालीत आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी १ जुलैपासून लागू केलेल्या जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हीस टॅक्स) अर्थात ’स्वस्तु व सेवा कर’ या नव्या करप्रणालीने उद्योग व व्यापार जगतातून प्रचंड नाराजी उफ ाळून आली होती. केंद्रीय कर विभागाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करताना व्यापाºयांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्याने शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ६६४ पैकी तब्बल ७ हजार ५४७ उद्योग व व्यापाºयांनी जीएसटी नोंदणी केल्याचे वास्तव पुढे आले आहे. २० लाखांपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल असलेल्या ११७ व्यापाºयांनी अद्याप जीएसटी नोंदणीच केली नाही.काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या जीएसटी अर्थात ’स्वस्तु व सेवा कर’ या नव्या करप्रणालीमध्ये काही बदल केल्यानंतर भाजपा सरकारने मंजुरी दिली होती. ३० जूनच्या मध्यरात्री राष्ट्रपतींनी या करप्रणालीचे उद्घाटन केले. विविध करांचे एकत्रीकरण झालेल्या या करप्रणालीची अंमलबजावणी १ जुलैपासून देशात सुरू झाली आहे. उद्योग आणि व्यावसायिकांना आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी केंद्रीय कर विभागाने १ जूनला संकेतस्थळ सुरू केले. शिवाय, कर प्रणालीबाबत जागृती घडविण्याच्या हेतूने उद्योग व व्यापाºयांसाठी कार्यशाळा घेतल्या. जिल्ह्यातही १२ ते १५ कार्यशाळा विविध ठिकाणी पार पडल्या होत्या. मात्र, नव्याने लागू होणाºया करप्रणालीतील काही अटी तसेच तांत्रिक अडचणींमुळे उद्योगजगत व व्यापाºयांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जीएसटी नोंदणीचे काम कासवगतीने सुरू होते. कर भरण्यास पात्र असणाºया जिल्ह्यातील व्यापाºयांचे दस्तावेज ’जीएसटी’ मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी कर विभागातील अधिकाºयांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. परंतु, संभ्रम दूर झाला नव्हता. दरम्यान, उद्योग व व्यापारी संघटनांनी बैठका घेऊन जीएसटी नोंदणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.परिणामी, जिल्ह्यातील एकूण सात हजार ६६४ पैकी तब्बल सात हजार ५४७ उद्योग-व्यापाºयांनी शुक्रवारपर्यंत जीएसटी नोंदणी पूर्ण केली. सद्य:स्थितीत केवळ ११७ व्यापारी जीएसटी कक्षेच्या बाहेर आहेत. यातील काही व्यापाºयांना अद्याप स्थायी स्वरुपाचा जीएसटी आयडी क्रमांक मिळाला नाही. मात्र, व्यवसाय करण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा दावा कर विभागाने केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून लागू असलेल्या जवळपास १७ करांचे जीएसटीमध्ये विलीन करण्यात आले.ग्राहकांचे काय?जीएसटी करप्रणालीमध्ये खरेदीवरील कराची पूर्ण वजावट असल्याने वस्तुच्या विक्रीवरील कराचा भार कमी होता. मालाची किंमत अदा करताना मालावरील कर हा एक भाग असतो. कराचा भार जास्त असल्यास मालाची किंमत जास्त असते. आतापर्यंत मालाच्या करावर कर लावण्यात येत होता. परिणामी, ग्राहकाला वस्तु महाग मिळायाची. जीएसटीमध्ये करावरील कर काढण्यात आल्याने मालाच्या विक्रीवरील भार कमी होऊन वस्तुंची किंमत कमी होईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण, बाजारात त्याचे सकारात्मक परिणाम ठळकपणे दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया जागरुक ग्राहकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.पुन्हा हवी सुधारणापुरेशी तयारी नसताना सरकारने जीएसटी लागू केली. त्यामुळे व्यापाºयांची अडचण झाली. प्रचंड मनस्ताप वाट्याला आला. व्यापारी कर द्यायला तयारच आहे. मात्र, ही व्यवस्था सोपी व सुटसुटीत असली पाहिजे. आता सरकारने बºयाच सुधारणा केल्याने गैरसमज दूर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील जीएसटी नोंदणी वाढली. पण, पुन्हा सुधारणेची गरज आहे.- सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर व्यापारी महासंघजीएसटी करप्रणालीत आता आमुलाग्र सुधारणा झाली आहे. वेगवेगळ्या कर जंजाळाचा प्रश्न कायमचा मिटला. त्यामुळे उद्योग व व्यापाºयांनी जीएसटीला सहकार्य करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करावी.- एस. व्ही. लहाने,राज्य कर उपायुक्त