शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचे तांडव

By admin | Updated: March 18, 2017 00:34 IST

कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे.

शेकडो घरांची छप्परे उडाली पिकांचे अपरिमित नुकसान, घरांचीही पडझडआशिष देरकर कोरपनाकर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची जोरदार मागणी अधिवेशनात सुरू आहे. अशातच निसर्गराजा शेतकऱ्यांवर कोपला असून जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीचे तांडव सुरू आहे. पाच दिवसांत तब्बल दोनदा अवकाळी वादळी पावसाने तांडव करून शेतकऱ्यांना पुरते हतबल करून सोडले आहे. गुरुवारी सायंकाळी ६-७ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात व इतर ठिकाणी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: रडायला भाग पाडले. या वदाळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर हजारो हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झाले आहे.गुरूवारच्या वादळी पावसाने कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर, सांगोडा, अंतरगाव, गाडेगाव, विरुर, भोयगाव, भारोसा, कवठाळा, तळोदी, बाखर्डी, निमनी, लखमापूर, उपरवाही, पिंपळगाव, खिर्डी, इंजापूर व परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, कापूस, मिरची इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अल्पावधीतच हाती येणारे पीक क्षणात अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.प्रातिनिधीक स्वरूपात सांगायचे झाल्यास तालुक्यातील बिबी येथील शेतकरी महादेव थेरे या तरुण शेतकऱ्याचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरचा गुरांचा गोठा पडून छोट्या वासराचा मृत्यू झाला व काही जनावरे जखमी झाली. शेतात नुकतेच हरभरा पीक कापून ढीग करून ठेवले होते. मात्र सकाळी जाऊन बघितले असता, ढिगारा नष्ट होऊन हरभरा शेतात अस्ताव्यस्त पसरून दूरवर उडाल्याचे दिसून आले. तळोधी येथील शेतकरी विठ्ठल गोहोकार, अरविंद गोहोकार व योगेश गोखरे यांच्याही घरांचे छत, जनावरांचा गोठा, साठवून ठेवलेला कापूस, जनावरांचा चारा, घरगुती धान्याचे वादळी पावसाने नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीनाचे छत उडाल्याने घरात पाणी पडून अनेक वस्तू भिजल्या. बाखर्डी येथील शेतकरी हरिभाऊ जेनेकर यांचा घरावर ठेवून असलेला कापूस वादळी पावसाने अक्षरश: उडवून नेला. दारात जागा अपुरी असल्यामुळे त्यांनी घरावर अंदाजे चार ते पाच क्विंटल कापूस ठेवला होता. मात्र वादळाच्या तडाख्यात घरावरील कापूस उडाला व तो भिजल्याने बेकामी झाला आहे. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची हिच अवस्था दिसून आली. चांगले पीक घेता यावे म्हणून बँकांचे कर्ज घेतले. जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेत नव्याने शेती कसण्याची वेळ आली असताना अवकाळी पावसाने सर्वस्व हिरावले. बँकांचे जुने कर्ज फेडण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, हा माझ्यासमोर बिकट प्रश्न आहे.- महादेव थेरे, शेतकरी, बिबी.अचानकच्या वादळी पावसाने धावाधाव झाली. अनेक शेतकऱ्यांचे गहू व हरभरा या पिकांचे शेतात ढिगारे होते. मात्र वादळी पावसामुळे ढिगारे झाकण्यासाठी शेतात पोहोचता आले नाही. यात हातचे पीक बिनकामी झाले आहे.- हरीदास जेनेकर, शेतकरी, बाखर्डी