शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सन्मानाने जगण्यासाठीच बौद्ध धम्म दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बाबूपेठ येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबूपेठ येथे बौद्ध धम्म नोंदणी व दीक्षा समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी समारंभाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी कृपाशरण महाथेरो तर मंचावर बंडू रामटेके, डॉ. कोसे, एम. डब्ल्यू. पुनवटकर, एन.डी. पिंपळे, सदानंद बेंद्रे आदी उपस्थित होते.दीक्षा समारंभाची सुरुवात भदंत श्रद्धापाल यांनी त्रिशरण पंचशील वंदना देऊन केली. राजरत्न अशोक आंबेडकर यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा ग्रहण करविल्या. राजरत्न आंबेडकर यांनी भारतीय बौद्धांचे नेतृत्व आणि जागतिक बौद्ध राष्ट्रातील भारतीयांची भूमिका आदी पैलुंवर विचार मांडले. त्रिपीटक हा बौद्ध धम्म ग्रंथ प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करायचे होते. ते कार्य आता ‘दी बुद्धीस्ट सोसायटी आॅफ इंडिया’ करणार आहे, असेही त्यांनी नमुद केले.जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतातील सर्व राज्यांमध्ये बौद्ध परिषदा आयोजित केल्या जात आहे. धम्म विचाराने विज्ञानाची कास धरली असून चुकीच्या विचारांना या तत्त्वज्ञानात कदापि थारा नाही, असे मत भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी व्यक्त केले. संचालन एन. डी. पिंपळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सुभाष खाडे यांनी धम्मकार्य गतिमान व्हावे यासाठी राजरत्न आंबेडकरांना धम्मदान दिले. यावेळी सुभाष खाडे, चरण दुर्गे, प्रकाश भाले, दयाल शेंडे, कुणाल उराडे, स्वप्नील तेलसे, प्रशांत रामटेके, बादल पिंपळे, आंचल शेंडे, लक्की पिंपळे, सिशीम पाटील, रितीक अलोणे उपस्थित होते.