शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सन्मानाने जगण्यासाठीच बौद्ध धम्म दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बाबूपेठ येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण होते. हे स्वप्न साकार करून सन्मानाने जगण्यासाठी बौद्ध धम्माची दीक्षा घेणे आवश्यक आहे, असे मत राजरत्न अशोक आंबेडकर यांनी व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबूपेठ येथे बौद्ध धम्म नोंदणी व दीक्षा समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी समारंभाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी कृपाशरण महाथेरो तर मंचावर बंडू रामटेके, डॉ. कोसे, एम. डब्ल्यू. पुनवटकर, एन.डी. पिंपळे, सदानंद बेंद्रे आदी उपस्थित होते.दीक्षा समारंभाची सुरुवात भदंत श्रद्धापाल यांनी त्रिशरण पंचशील वंदना देऊन केली. राजरत्न अशोक आंबेडकर यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा ग्रहण करविल्या. राजरत्न आंबेडकर यांनी भारतीय बौद्धांचे नेतृत्व आणि जागतिक बौद्ध राष्ट्रातील भारतीयांची भूमिका आदी पैलुंवर विचार मांडले. त्रिपीटक हा बौद्ध धम्म ग्रंथ प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करायचे होते. ते कार्य आता ‘दी बुद्धीस्ट सोसायटी आॅफ इंडिया’ करणार आहे, असेही त्यांनी नमुद केले.जगातील बौद्ध राष्ट्रांशी भारतीय बौद्धांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारतातील सर्व राज्यांमध्ये बौद्ध परिषदा आयोजित केल्या जात आहे. धम्म विचाराने विज्ञानाची कास धरली असून चुकीच्या विचारांना या तत्त्वज्ञानात कदापि थारा नाही, असे मत भंते श्रद्धापाल महास्थवीर यांनी व्यक्त केले. संचालन एन. डी. पिंपळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सुभाष खाडे यांनी धम्मकार्य गतिमान व्हावे यासाठी राजरत्न आंबेडकरांना धम्मदान दिले. यावेळी सुभाष खाडे, चरण दुर्गे, प्रकाश भाले, दयाल शेंडे, कुणाल उराडे, स्वप्नील तेलसे, प्रशांत रामटेके, बादल पिंपळे, आंचल शेंडे, लक्की पिंपळे, सिशीम पाटील, रितीक अलोणे उपस्थित होते.