शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार काय?

By admin | Updated: September 25, 2015 01:35 IST

चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही?

राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही? गेल्या काही दिवसांपासून ओव्हवलोड वाहतूक सर्रास सुरू असून यामुळे अपघात वाढले आहेत. मात्र या वाहनांवर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यात ओव्हरलोड वाहने, अवैध भंगार विक्रेते, हजारो दारु विक्रेते खुलेआम नियमाचे उल्लंघन करीत आहेत. यावर तोडगा कधी काढणार? एखाद्या मुलाने वाहन खरेदी केले तर त्याला ताबडतोब नंबर दिली पाहिजे. मात्र दोन- तीन महिने नंबरच मिळत नाही, याला जबाबदार कोण, गाडी घेणारे की, नंबर देणारे? जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास करतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडते. मात्र कारवाई होत नाही. अनेक वाहनधारकांजवळ कागदपत्रे नाही, फक्त मोहिम उघडून चालणार नाही तर ही मोहिम वर्षभर ठेवणे गरजेचे आहे. तरच यावर आळा बसेल नाही तर अवैध कामे राजरोसपणे चालुच राहणार एवढे मात्र निश्चित.चंद्रपूर शहरात शहराबाहेरुन राजुरा, बल्लारपूरवरुन येणारी वाहने पकडली जात आहेत. चंद्रपूर शहरात तर नंबरविना अनेक वाहने धावत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. हेलमेट तर कुणीच घालताना दिसत नाही. पोलीसच हेलमेटचा वापर करीत नाही तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करावयाच्या. चंद्रपूर शहरात केवळ महाविद्यालयीन मुलाना वेठीस धरण्याऐवजी मुलांची बाजु सुद्धा ऐकूण घेणे गरजेचे आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी. (शहर प्रतिनिधी)