शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार काय?

By admin | Updated: September 25, 2015 01:35 IST

चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही?

राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही? गेल्या काही दिवसांपासून ओव्हवलोड वाहतूक सर्रास सुरू असून यामुळे अपघात वाढले आहेत. मात्र या वाहनांवर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यात ओव्हरलोड वाहने, अवैध भंगार विक्रेते, हजारो दारु विक्रेते खुलेआम नियमाचे उल्लंघन करीत आहेत. यावर तोडगा कधी काढणार? एखाद्या मुलाने वाहन खरेदी केले तर त्याला ताबडतोब नंबर दिली पाहिजे. मात्र दोन- तीन महिने नंबरच मिळत नाही, याला जबाबदार कोण, गाडी घेणारे की, नंबर देणारे? जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास करतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडते. मात्र कारवाई होत नाही. अनेक वाहनधारकांजवळ कागदपत्रे नाही, फक्त मोहिम उघडून चालणार नाही तर ही मोहिम वर्षभर ठेवणे गरजेचे आहे. तरच यावर आळा बसेल नाही तर अवैध कामे राजरोसपणे चालुच राहणार एवढे मात्र निश्चित.चंद्रपूर शहरात शहराबाहेरुन राजुरा, बल्लारपूरवरुन येणारी वाहने पकडली जात आहेत. चंद्रपूर शहरात तर नंबरविना अनेक वाहने धावत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. हेलमेट तर कुणीच घालताना दिसत नाही. पोलीसच हेलमेटचा वापर करीत नाही तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करावयाच्या. चंद्रपूर शहरात केवळ महाविद्यालयीन मुलाना वेठीस धरण्याऐवजी मुलांची बाजु सुद्धा ऐकूण घेणे गरजेचे आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी. (शहर प्रतिनिधी)