शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार काय?

By admin | Updated: September 25, 2015 01:35 IST

चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही?

राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही? गेल्या काही दिवसांपासून ओव्हवलोड वाहतूक सर्रास सुरू असून यामुळे अपघात वाढले आहेत. मात्र या वाहनांवर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यात ओव्हरलोड वाहने, अवैध भंगार विक्रेते, हजारो दारु विक्रेते खुलेआम नियमाचे उल्लंघन करीत आहेत. यावर तोडगा कधी काढणार? एखाद्या मुलाने वाहन खरेदी केले तर त्याला ताबडतोब नंबर दिली पाहिजे. मात्र दोन- तीन महिने नंबरच मिळत नाही, याला जबाबदार कोण, गाडी घेणारे की, नंबर देणारे? जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास करतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडते. मात्र कारवाई होत नाही. अनेक वाहनधारकांजवळ कागदपत्रे नाही, फक्त मोहिम उघडून चालणार नाही तर ही मोहिम वर्षभर ठेवणे गरजेचे आहे. तरच यावर आळा बसेल नाही तर अवैध कामे राजरोसपणे चालुच राहणार एवढे मात्र निश्चित.चंद्रपूर शहरात शहराबाहेरुन राजुरा, बल्लारपूरवरुन येणारी वाहने पकडली जात आहेत. चंद्रपूर शहरात तर नंबरविना अनेक वाहने धावत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. हेलमेट तर कुणीच घालताना दिसत नाही. पोलीसच हेलमेटचा वापर करीत नाही तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करावयाच्या. चंद्रपूर शहरात केवळ महाविद्यालयीन मुलाना वेठीस धरण्याऐवजी मुलांची बाजु सुद्धा ऐकूण घेणे गरजेचे आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी. (शहर प्रतिनिधी)