शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

केवळ अवशेषमध्येच उरणार काय चिमूर क्रांतीचा इतिहास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

ऐतिहासिक वास्तू इतिहासात जमा होऊ नये : लोखंडी पूल मोजतोय अखेरची घटका राजकुमार चुनारकर चिमूर : १६ ऑगस्ट १९४२ ...

ऐतिहासिक वास्तू इतिहासात जमा होऊ नये : लोखंडी पूल मोजतोय अखेरची घटका

राजकुमार चुनारकर

चिमूर : १६ ऑगस्ट १९४२ ला चिमुरात झालेल्या क्रांतीने चिमूर देशात तीन दिवस स्वतंत्र होते. त्यामुळे चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे. १९४२ च्या क्रांतीचे मूकसाक्षीदार असलेले ऐतिहासिक अभ्यंकर मैदान, नागमंदिर, डागबंगला, कोंडवाडा व लोखंडी पूल या वास्तू त्या लढ्यातील मूकसाक्षीदार आहेत, नवीन पिढीला या क्रांतीची माहिती होण्याकरिता या ऐतिहासिक वास्तूंचे संग्रहालय सुरू करण्यासाठी शासनासह स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. येथील अनेक वास्तू या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिमुरातील हा ऐतिहासिक इमारतींचा ठेवा भविष्यात केवळ पत्ता सांगण्यापुरता मर्यादित राहणार काय, अशी भीती स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे परिवार व्यक्त करीत आहेत.

चिमूर शहरात १६ ऑगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेच्या मूकसाक्षीदार असलेल्या डाकबंगला, लोखंडी पूल ,कोंडवाडा, अभ्यंकर मैदान यासह अनेक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वास्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरिता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे. त्यामुळे चिमूर क्रांती अवशेषमध्येच उरणार काय, अशी भीती आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

बॉक्स

संग्रहालय उभारण्याची गरज

इतिहासातील अनेक वास्तू व वास्तूंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजूनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे प्रेरणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.

बॉक्स

असा आहे इतिहास

१६ ऑगस्ट १९४२ ला अभ्यंकर मैदानावर शेकडो क्रांतिकारक गोळा झाले. तिथून प्रभातफेरी काढण्यात आली. बालाजी मंदिर मार्गे व तो दिवस नागपंचमीचा असल्याने नागमंदिर येथे क्रांतिकारक पोहचले. याच दरम्यान इंग्रजांनी डिवचल्याने क्रांतिकारकांनी डागबंगला येथे लपून असलेले इंग्रज अधिकारी सोनवणे, डुंगाजी यांचा या बंगल्यात वध केला तर लोखंडी पुलावर जरासंधचा वध केला. त्यामुळे या क्रांतीतील हे मूकसाक्षीदार आहेत.

बॉक्स

इंग्रजांनी नागरिकांना कोंडवाड्यात कोंडले

१५ बाय २० फूट जागेत असलेल्या जनावरांच्या कोंडवाड्यात तब्बल २५० क्रांतिकारकांना जनावरांसारखे डांबण्यात आले. त्या कोंडवाड्यामध्ये दुर्गंधीशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे हा कोंडवाडाही साक्षीदार असून तोही मोडकळीस आला आहे.

140821\img20210814104039.jpg

चिमुर क्रांतीतील मूक साक्षीदार