शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची शेतात जागली

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही

राजुरा : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही शेतात जागली जावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून आहे. शेतकऱ्यांना दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. यावर्षीच्या हंगामात आधी लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढविला. त्यानंतर गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. यातून वाचलेले पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांवर रानडुकरांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांच्या रक्षणासाठी आता बळीराजाला थंडीच्या दिवसांत रात्री जागावे लागत आहे. कोरपना, राजुरा तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, विरूर, गाडेगाव, जैतापूर, नांदगाव, कवठाळा, एकोडी, कुर्ली, मारडा, पेल्लोरा, धिडसी, वरोरा, साखरी, चार्ली निर्ली, कडोली, गोवरी, पोवनी, बाबापूर, मानोली, चुनाळा, चनाखा, सातरी, विहिरगाव, नलफडी, सुर्ती, सोंडो, सुमठाना, वरूर, पाचगाव, चिंचोली, अंतरगाव यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर डुकर, हरीण, रोई व कोल्हा आदी वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रात्र जागून पिकांचे रक्षण करीत आहेत. रानडुकरांचे कडप शेतात धुमाकूळ घालून उभे पीक नष्ट करतात. तसेच कापणी झालेल्या पिकांचीही नासधूस करतात. पीक वाचविण्यासाठी घडपड सुरु असून रामेश्वर निमकर या शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील धानपीक वन्यप्राण्यांने नष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)