शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची शेतात जागली

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही

राजुरा : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही शेतात जागली जावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून आहे. शेतकऱ्यांना दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. यावर्षीच्या हंगामात आधी लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढविला. त्यानंतर गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. यातून वाचलेले पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांवर रानडुकरांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांच्या रक्षणासाठी आता बळीराजाला थंडीच्या दिवसांत रात्री जागावे लागत आहे. कोरपना, राजुरा तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, विरूर, गाडेगाव, जैतापूर, नांदगाव, कवठाळा, एकोडी, कुर्ली, मारडा, पेल्लोरा, धिडसी, वरोरा, साखरी, चार्ली निर्ली, कडोली, गोवरी, पोवनी, बाबापूर, मानोली, चुनाळा, चनाखा, सातरी, विहिरगाव, नलफडी, सुर्ती, सोंडो, सुमठाना, वरूर, पाचगाव, चिंचोली, अंतरगाव यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर डुकर, हरीण, रोई व कोल्हा आदी वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रात्र जागून पिकांचे रक्षण करीत आहेत. रानडुकरांचे कडप शेतात धुमाकूळ घालून उभे पीक नष्ट करतात. तसेच कापणी झालेल्या पिकांचीही नासधूस करतात. पीक वाचविण्यासाठी घडपड सुरु असून रामेश्वर निमकर या शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील धानपीक वन्यप्राण्यांने नष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)