शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची शेतात जागली

By admin | Updated: November 16, 2014 22:48 IST

शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही

राजुरा : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही शेतात जागली जावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून आहे. शेतकऱ्यांना दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. यावर्षीच्या हंगामात आधी लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढविला. त्यानंतर गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. यातून वाचलेले पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांवर रानडुकरांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांच्या रक्षणासाठी आता बळीराजाला थंडीच्या दिवसांत रात्री जागावे लागत आहे. कोरपना, राजुरा तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, विरूर, गाडेगाव, जैतापूर, नांदगाव, कवठाळा, एकोडी, कुर्ली, मारडा, पेल्लोरा, धिडसी, वरोरा, साखरी, चार्ली निर्ली, कडोली, गोवरी, पोवनी, बाबापूर, मानोली, चुनाळा, चनाखा, सातरी, विहिरगाव, नलफडी, सुर्ती, सोंडो, सुमठाना, वरूर, पाचगाव, चिंचोली, अंतरगाव यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर डुकर, हरीण, रोई व कोल्हा आदी वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रात्र जागून पिकांचे रक्षण करीत आहेत. रानडुकरांचे कडप शेतात धुमाकूळ घालून उभे पीक नष्ट करतात. तसेच कापणी झालेल्या पिकांचीही नासधूस करतात. पीक वाचविण्यासाठी घडपड सुरु असून रामेश्वर निमकर या शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील धानपीक वन्यप्राण्यांने नष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)