शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:30 IST

तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअंधारी नदीचे पात्र कोरडे : शिवारातील विहिरी भागवितात गावकऱ्यांची तहान

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, अंधारी नदीचे पात्र सध्या कोरडे पडले असल्याने स्थानिक नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने एप्रिल-मे महिन्यामध्येच विहीरी कोरड्या पडतात. तर हातपंपाचे पाणी फार खोलवर जाते. त्यामुळे उन्हाळा आला तर शेतशिवारातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते आणि इतर शेती विषयक कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावात कायम आहे.गावातील भीषण पाणी टंचाईला कंटाळून अनेकजण आपल्या मुलांना नातेवाईकांच्या गावी पाठवितात. माणसांचेच हाल होत असेल तर जनावरांचे काय, असा गंभीर प्रश्न याठिकाणी दरवर्षी निर्माण होतो. बाहेर पाणी पिवून आल्यानंतरही जनावरे घरी आल्यावर पाण्याने व्याकुळ होतात. पण घरी आल्यावर रिकामे टाके असल्याने घराशेजारी जनावरे पाण्यासाठी भटकत राहतात. त्यांच्यासाठी कसेबसे पाणी आणून पाजावे लागते. या परिस्थितीला कंटाळून महिलांच्या तोंडातून हे गाव पाण्यासाठी पापी असल्याचे उद्गार निघत असते.दरवर्षी उन्हाळा आला की दोर बादली घेऊन लहान मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी लांबवर नेत असतात. तर अनेक महिला पाण्यासाठी चक्क रात्र जागून पाणी भरतात. दरवर्षी या गावात एवढी भीषण पाणी टंचाई सुरू असून सुद्धा या गावात योग्य पाणी पुरवठा कार्यान्वीत करण्यास प्रशासन मात्र कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावकºयांसाठी वर्षभर पाणी पुरवठा करणारी यंत्रणा गावात कार्यान्वीत करावी, अशी मागणी देवाडा खुर्द येथील गावकºयांनी केली आहे.ग्रामपंचायतीचे प्रयत्न पडले अपुरेस्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अंधारी नदीच्या पात्रात जेसीबीने खोल खड्डा तयार करण्यात आला. परंतु, त्याही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने अंधारी नदीवरील पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहीरीतून दोर बादलीने थोडे थोडे पाणी काढून तासन्तास पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.