शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:30 IST

तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअंधारी नदीचे पात्र कोरडे : शिवारातील विहिरी भागवितात गावकऱ्यांची तहान

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द गावात दरवर्षी पाणी समस्या उद्भवत असते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पाणी समस्या असताना याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सध्या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी स्थानिक महिला अख्खी रात्र जागून शिवारातील विहीरीचे पाणी आणतात. काही नागरिक बैलबंडीने पाणी आणत असून हातपंप तासन्तास हलवूनही पाणी येत नसल्याने गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना नळाद्वारे पाणी दिले जाते. परंतु, अंधारी नदीचे पात्र सध्या कोरडे पडले असल्याने स्थानिक नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने एप्रिल-मे महिन्यामध्येच विहीरी कोरड्या पडतात. तर हातपंपाचे पाणी फार खोलवर जाते. त्यामुळे उन्हाळा आला तर शेतशिवारातील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते आणि इतर शेती विषयक कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते, हे विदारक चित्र गेल्या अनेक वर्षांपासून या गावात कायम आहे.गावातील भीषण पाणी टंचाईला कंटाळून अनेकजण आपल्या मुलांना नातेवाईकांच्या गावी पाठवितात. माणसांचेच हाल होत असेल तर जनावरांचे काय, असा गंभीर प्रश्न याठिकाणी दरवर्षी निर्माण होतो. बाहेर पाणी पिवून आल्यानंतरही जनावरे घरी आल्यावर पाण्याने व्याकुळ होतात. पण घरी आल्यावर रिकामे टाके असल्याने घराशेजारी जनावरे पाण्यासाठी भटकत राहतात. त्यांच्यासाठी कसेबसे पाणी आणून पाजावे लागते. या परिस्थितीला कंटाळून महिलांच्या तोंडातून हे गाव पाण्यासाठी पापी असल्याचे उद्गार निघत असते.दरवर्षी उन्हाळा आला की दोर बादली घेऊन लहान मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी लांबवर नेत असतात. तर अनेक महिला पाण्यासाठी चक्क रात्र जागून पाणी भरतात. दरवर्षी या गावात एवढी भीषण पाणी टंचाई सुरू असून सुद्धा या गावात योग्य पाणी पुरवठा कार्यान्वीत करण्यास प्रशासन मात्र कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावकºयांसाठी वर्षभर पाणी पुरवठा करणारी यंत्रणा गावात कार्यान्वीत करावी, अशी मागणी देवाडा खुर्द येथील गावकºयांनी केली आहे.ग्रामपंचायतीचे प्रयत्न पडले अपुरेस्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अंधारी नदीच्या पात्रात जेसीबीने खोल खड्डा तयार करण्यात आला. परंतु, त्याही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने अंधारी नदीवरील पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या विहीरीतून दोर बादलीने थोडे थोडे पाणी काढून तासन्तास पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.