शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पहाडावर का पोहचत नाही शासकीय योजना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST

दीपक साबने जिवती : ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ...

दीपक साबने

जिवती : ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत असते; परंतु जिवती तालुक्यातील वास्तविक स्थिती पाहता बऱ्याच शासकीय विभागात निधीचा अपहार दिसत आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा, आरोग्याचा, पाणीपुरवठा वितरण व इतर व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन झाले नाही. बोटावर मोजण्याइतपत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. त्यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. पथदिवे खरेदी, दुरुस्ती, पाणीपुरवठा दुरुस्ती, नालीसफाई, अंगणवाडी साहित्य खरेदी, सीसी रस्ता, शौचालय, घरकुल बांधकाम, शाळा दुरुस्ती अशा मूलभूत सुविधांच्या विविध कामांच्या माध्यमातून निधीचा अपहार होत आहे.

प्रत्येक गावामध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर झालेला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामात रोजगार सेवकांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे अनेकांना मजुरी मिळत नाही. नरेगा, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजने यासारख्या योजना अपूर्ण अवस्थेत झालेल्या आहेत. योग्य नियोजनाअभावी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना रोजगारासाठी बाहेर राज्यात, जिल्ह्यात जावे लागते.

बॉक्स

योजना केवळ जाहिरातीपुरत्याच

बेटी पढाओ, बेटी बचाओ योजना व इतर फक्त जाहिरातीच्या मध्यमातूनच जनजागृती होताना दिसत आहे. वास्तविक चित्र उलट आहे. ग्रामीण भागातील मुलींचे लग्न अल्पवयात केले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. अल्पवयात लग्न झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपंग बांधवांसाठी कोणत्याही सक्षम उपाययोजना राबवल्या जात नाहीत. त्यांचे अधिकार त्यांना मिळत नाहीत. सामान्य शेतकऱ्यांना पट्टे नाहीत. बोगस पट्टेदारांना कर्ज मिळते; परंतु सामान्य शेतकऱ्यांना नाही. प्रत्येक गावामध्ये शेतरस्त्याची अडचण आहे. शेतरस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे सर्वसाधारण शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला शेतमाल शेतातच ठेवावा लागत आहे. त्यामुळे शेतमालाचे नैसर्गिक आपत्ती किंवा वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. या सर्वांना प्रशासनाचा दिशाहीन व सुस्त कारभार जबाबदार आहे.