शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावर का पोहचत नाही शासकीय योजना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST

दीपक साबने जिवती : ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ...

दीपक साबने

जिवती : ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांचे दैनंदिन जीवन उंचावण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत असते; परंतु जिवती तालुक्यातील वास्तविक स्थिती पाहता बऱ्याच शासकीय विभागात निधीचा अपहार दिसत आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा, आरोग्याचा, पाणीपुरवठा वितरण व इतर व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन झाले नाही. बोटावर मोजण्याइतपत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. त्यामुळे गावातील नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. पथदिवे खरेदी, दुरुस्ती, पाणीपुरवठा दुरुस्ती, नालीसफाई, अंगणवाडी साहित्य खरेदी, सीसी रस्ता, शौचालय, घरकुल बांधकाम, शाळा दुरुस्ती अशा मूलभूत सुविधांच्या विविध कामांच्या माध्यमातून निधीचा अपहार होत आहे.

प्रत्येक गावामध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर झालेला आहे. रोजगार हमी योजनेच्या कामात रोजगार सेवकांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे अनेकांना मजुरी मिळत नाही. नरेगा, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजने यासारख्या योजना अपूर्ण अवस्थेत झालेल्या आहेत. योग्य नियोजनाअभावी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना रोजगारासाठी बाहेर राज्यात, जिल्ह्यात जावे लागते.

बॉक्स

योजना केवळ जाहिरातीपुरत्याच

बेटी पढाओ, बेटी बचाओ योजना व इतर फक्त जाहिरातीच्या मध्यमातूनच जनजागृती होताना दिसत आहे. वास्तविक चित्र उलट आहे. ग्रामीण भागातील मुलींचे लग्न अल्पवयात केले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. अल्पवयात लग्न झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपंग बांधवांसाठी कोणत्याही सक्षम उपाययोजना राबवल्या जात नाहीत. त्यांचे अधिकार त्यांना मिळत नाहीत. सामान्य शेतकऱ्यांना पट्टे नाहीत. बोगस पट्टेदारांना कर्ज मिळते; परंतु सामान्य शेतकऱ्यांना नाही. प्रत्येक गावामध्ये शेतरस्त्याची अडचण आहे. शेतरस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे सर्वसाधारण शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला शेतमाल शेतातच ठेवावा लागत आहे. त्यामुळे शेतमालाचे नैसर्गिक आपत्ती किंवा वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. या सर्वांना प्रशासनाचा दिशाहीन व सुस्त कारभार जबाबदार आहे.