शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

पुतळा उभारताना प्रशासनाने आक्षेप का घेतला नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा ...

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभारताना प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही, असा प्रश्न निवृत्त प्रशासकीय अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत प्रभू राजगडकर यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.

चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू राजगडकर म्हणाले, ज्याअर्थी पुतळा उभारला त्याअर्थी उभारण्याबाबतचे सोपस्कार पूर्ण केले असावेत, हे गृहीत धरावे लागेल. पुतळ्यासाठी चबुतरा आदी बांधकाम सुरू होते. पुतळाही बसवला आणि अचानक दोन दिवसांनी मनपा प्रशासनाने क्रेनने उचलून नेला. त्याची मोडतोड झाली का, तो जप्त करून कुठे ठेवला का, हेही आदिवासींना कळू दिले नाही. याबाबतची वस्तुस्थिती पुतळा समिती व माध्यमांनी जनतेसमोर मांडावी. परंतु, पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभा उभारल्यानंतरही प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही. घेतला असेल तर पुतळा समितीने त्यावर काय केले, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे, याकडेही राजगडकर यांनी लक्ष वेधले.

ही तर सामंतवादी मानसिकता

संसदेत तैलचित्र लावून भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान केला जात आहे. मात्र, या महापुरुषाचा चंद्रपुरातील पुतळा अशा अमानुष तऱ्हेने क्रेनने उचलून नेणे म्हणजे बिरसा मुंडा यांचा उपमर्दच नव्हे तर आदिवासींना आम्ही मोजत नाही, असा हा दंभ आहे. आदिवासींना कोणत्याही तऱ्हेने अपमानित केले तरी काहीच फरक पडत नाही, ही सामंतवादी मानसिकता असल्याने तरुणाईने संविधानिक चौकटीतून प्रतिकार केला पाहिजे, असेही राजगडकर यांनी चर्चेदरम्यान म्हणाले.

सन्माननीय तोडगा काढावा

ब्रिटिश राजवटीत आदिवासींवर अन्याय झाल्याने बिरसा मुंडा यांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांतही अन्याय होत असेल तर आदिवासींनी काय करायला हवे, हे कोणी सांगू शकेल? त्यामुळे यावर प्रशासन, सर्व राजकीय पक्ष, आदिवासी समाज, पुतळा समिती व सर्वांनी मिळून तातडीने सन्माननीय तोडगा काढावा, अशी अपेक्षाही राजगडकर यांनी व्यक्त केली.