शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

पुतळा उभारताना प्रशासनाने आक्षेप का घेतला नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा ...

चंद्रपूर : चक्क वर्दळीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामागे, बीएसएनएल कार्यालयाशेजारी भगवान बिरसा मुंडा पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभारताना प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही, असा प्रश्न निवृत्त प्रशासकीय अधिकारी व ज्येष्ठ विचारवंत प्रभू राजगडकर यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते.

चंद्रपूर महानगरपालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू राजगडकर म्हणाले, ज्याअर्थी पुतळा उभारला त्याअर्थी उभारण्याबाबतचे सोपस्कार पूर्ण केले असावेत, हे गृहीत धरावे लागेल. पुतळ्यासाठी चबुतरा आदी बांधकाम सुरू होते. पुतळाही बसवला आणि अचानक दोन दिवसांनी मनपा प्रशासनाने क्रेनने उचलून नेला. त्याची मोडतोड झाली का, तो जप्त करून कुठे ठेवला का, हेही आदिवासींना कळू दिले नाही. याबाबतची वस्तुस्थिती पुतळा समिती व माध्यमांनी जनतेसमोर मांडावी. परंतु, पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असताना आणि पुतळा उभा उभारल्यानंतरही प्रशासनाने काहीच आक्षेप कसा घेतला नाही. घेतला असेल तर पुतळा समितीने त्यावर काय केले, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे, याकडेही राजगडकर यांनी लक्ष वेधले.

ही तर सामंतवादी मानसिकता

संसदेत तैलचित्र लावून भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान केला जात आहे. मात्र, या महापुरुषाचा चंद्रपुरातील पुतळा अशा अमानुष तऱ्हेने क्रेनने उचलून नेणे म्हणजे बिरसा मुंडा यांचा उपमर्दच नव्हे तर आदिवासींना आम्ही मोजत नाही, असा हा दंभ आहे. आदिवासींना कोणत्याही तऱ्हेने अपमानित केले तरी काहीच फरक पडत नाही, ही सामंतवादी मानसिकता असल्याने तरुणाईने संविधानिक चौकटीतून प्रतिकार केला पाहिजे, असेही राजगडकर यांनी चर्चेदरम्यान म्हणाले.

सन्माननीय तोडगा काढावा

ब्रिटिश राजवटीत आदिवासींवर अन्याय झाल्याने बिरसा मुंडा यांनी लढा दिला. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांतही अन्याय होत असेल तर आदिवासींनी काय करायला हवे, हे कोणी सांगू शकेल? त्यामुळे यावर प्रशासन, सर्व राजकीय पक्ष, आदिवासी समाज, पुतळा समिती व सर्वांनी मिळून तातडीने सन्माननीय तोडगा काढावा, अशी अपेक्षाही राजगडकर यांनी व्यक्त केली.