शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

सर्वच प्रयोग सरपंचांवर कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच ...

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच पदाचे स्वप्न बघणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे यावेळी पॅनलला प्रत्येक जागाच निवडून आणणे गरजेचे आहे. नाही तर बहुमत एकाकडे आणि सरपंच पद दुसऱ्याकडे अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील काही वर्षांपासून सरपंच पदावर डोळा ठेवून तयारी करणाऱ्या पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल, त्यालाच उभे करावे लागणार आहे.

आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पॅनलला मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, निवडणूक होऊन सरपंचपद दुसऱ्याबाजूने गेले तर अविश्वास ठराव आणण्याची धडपड भविष्यात अन्य उमेदवार करतील, हे मात्र नक्की. यामध्ये ग्रामविकास खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असतानाही सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

६२९जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक

अडचणीत होणार वाढ

निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे गावागावात अडचणीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सत्ता एकीकडे आणि बहुमत दुसरीकडे अशी अवस्था गावांची होतील, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

सरपंच परिषदेचे मत

ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. आरक्षण नसल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. सरपंच हा पांढरा उंदिर नाही. त्यामुळे केंद्रापासून तर ग्रामपंचायत पर्यंत अनेक निवडणू होत असतानाच प्रयोग केवळ सरपंच पदांवरच का? असा प्रश्न अखिल भारतीय सरपंच परिषदेने उपस्थित केला आहे.

--

कोट

निवडणुकीनंतर आरक्षण काढण्यात येणार आहे. यामध्ये एखाद्या गावात बहुमत असतानाही आरक्षण असलेला सरपंच पदाचा उमेदवार त्या पॅनलकडे नसेल तर बहुमत असतानाही सत्ता मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे सरपंचावर प्रयोग न करता अन्य निवडणुकीवर करावा आणि निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचा आरक्षण काढावे.

-पारस पिपंळशेंडे

जिल्हा संपर्क प्रमुख, अखिल भारतीय सरपंच संघटना

---

सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे निवडणुकीनंतर गावागावात तंटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षणानुसार जर बहुमत असलेल्या पॅनलकडे उमेदवार नसेल तर सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.

छबुताई बोंडे

माजी सरपंच साखरवाही

---

आरक्षण काढण्यात न आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून सरपंच पदाचे आरक्षण काढणे गरजेचे आहे.

-अजुर्न पायपरे

माजी सरपंच चिंचोली खुर्द