शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

सर्वच प्रयोग सरपंचांवर कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच ...

चंद्रपूर : १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्यामुळे सरपंच पदाचे स्वप्न बघणाऱ्या अनेक उमेदवारांचे स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे यावेळी पॅनलला प्रत्येक जागाच निवडून आणणे गरजेचे आहे. नाही तर बहुमत एकाकडे आणि सरपंच पद दुसऱ्याकडे अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील काही वर्षांपासून सरपंच पदावर डोळा ठेवून तयारी करणाऱ्या पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल, त्यालाच उभे करावे लागणार आहे.

आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पॅनलला मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, निवडणूक होऊन सरपंचपद दुसऱ्याबाजूने गेले तर अविश्वास ठराव आणण्याची धडपड भविष्यात अन्य उमेदवार करतील, हे मात्र नक्की. यामध्ये ग्रामविकास खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असतानाही सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे.

६२९जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक

अडचणीत होणार वाढ

निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्यामुळे गावागावात अडचणीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सत्ता एकीकडे आणि बहुमत दुसरीकडे अशी अवस्था गावांची होतील, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

सरपंच परिषदेचे मत

ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. आरक्षण नसल्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. सरपंच हा पांढरा उंदिर नाही. त्यामुळे केंद्रापासून तर ग्रामपंचायत पर्यंत अनेक निवडणू होत असतानाच प्रयोग केवळ सरपंच पदांवरच का? असा प्रश्न अखिल भारतीय सरपंच परिषदेने उपस्थित केला आहे.

--

कोट

निवडणुकीनंतर आरक्षण काढण्यात येणार आहे. यामध्ये एखाद्या गावात बहुमत असतानाही आरक्षण असलेला सरपंच पदाचा उमेदवार त्या पॅनलकडे नसेल तर बहुमत असतानाही सत्ता मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे सरपंचावर प्रयोग न करता अन्य निवडणुकीवर करावा आणि निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचा आरक्षण काढावे.

-पारस पिपंळशेंडे

जिल्हा संपर्क प्रमुख, अखिल भारतीय सरपंच संघटना

---

सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात न आल्यामुळे निवडणुकीनंतर गावागावात तंटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरक्षणानुसार जर बहुमत असलेल्या पॅनलकडे उमेदवार नसेल तर सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.

छबुताई बोंडे

माजी सरपंच साखरवाही

---

आरक्षण काढण्यात न आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून सरपंच पदाचे आरक्षण काढणे गरजेचे आहे.

-अजुर्न पायपरे

माजी सरपंच चिंचोली खुर्द