शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तर अपघातग्रस्तांना कोण मदत करणार ?

By admin | Updated: March 26, 2015 00:59 IST

सज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा.

संतोष मेश्राम चिचपल्लीसज्जनाचा पुरस्कार आणि दुर्जनांचा धिक्कार, हे पोलीस खात्याचे ब्रीद. पोलीस प्रशासन जनतेचे मित्र, अशी समाजात प्रतिमा. परंतु चिचपल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागामार्फत झालेली कारवाई मात्र अन्यायकारक असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून येत आहे. झालेल्या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा समाजात मलीन झालेली आहे.झाले असे की चंद्रपूर - मूल मार्गावर एक ट्रक सिमेंट बॅग भरून रायपूरला निघाला होता. चिचपल्ली गावाजवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे वाहनावरील संतुलन बिघडले. त्यात रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाला. त्यात जवळपास पाचशे सिमेंटचे बॅग्स होते. रस्त्याच्या कडेला गोंडसावरी येथील छत्रपती रामचंद्र घाटे हे आपली दुचाकी रस्त्याचा बाजुला उभी करून मोबाईलवर बोलत होते. झालेल्या अपघातामुळे ट्रकमधील सिमेंट बॅग त्यांच्या अंगावर पडल्याने तो त्यात पूर्णपणे दबला गेला. उपस्थित जनसमुदायांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. तो मृत्यूशी झुंज देत होता. नागरिकांनी समयसुचकता दाखवित तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शेवटी मृत्यूचाच विजय झाला. हतबल झालेले नागरिक मृतदेह घेऊन घटनास्थळावर दाखल झाले आणि पोलीस यंत्रणेचे वाट बघू लागले. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. परंतु वेळेवर कोणीही हजर होऊ शकले नाही. जवळपास दोन ते तीन तासांनी रामनगर येथील पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्धात नारेबाजी केली. जोपर्यंत मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या परिवारासह नागरिकांनी घेतल्यामुळे पेच निर्माण झाला. पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करावयाची होती. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करीत मृताच्या पत्नी व वडिलाला अमानुषपणे मारहाण करीत मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे उपस्थितांनी नारेबाजी केली. त्यामुळे भांबावलेल्या पोलिसांनी अनेकांना दंगा नियंत्रण पथकाद्वारे बदलून काढले. या सर्व घटनेची एका युवकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकार्डिंग केली. आपले दुष्कृत्य चव्हाट्यावर येणार, या भीतीपोटी पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करून त्याचा मोबाईल ताब्यात घेतला व उपस्थित असलेल्या व सहकार्य करणाऱ्या १९ व्यक्तीवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले.त्याची रात्रीच्या सुमारास धरपकड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकरवी होत असलेल्या अत्याचारामुळे जनमाणसात असंतोष खदखदत असून भविष्यात एखादी असा प्रसंग उद्भवला तर मदतनीस म्हणून कोण पुढे जाणार, असा सुर सध्यातरी चिचपल्ली परिसरात उघडपणे व्यक्त होत आहे.