शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

साहित्य कोणाची मिरासदारी नाही

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही,...

शरदचंद्र सालफळे : सूर्यांश पुरस्कार अशोक पवारांना प्रदानचंद्रपूर : जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी केले.सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने रविवारी शामाप्रसाद मुखर्जी सहभागृहात साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सालफळे होते. विशेष अतिथी म्हणून नागपूर येथील कवयित्री मनिषा साधू उपस्थित होत्या. मंचावर प्रमुख पाहुणे नाट्यकर्मी सुनील देशपोंडे, इतिहासतज्ज्ञ अशोकसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.डॉ. सालफळे म्हणाले की, जसे वाङमयीन साहित्य असते. त्याप्रमाणे शिवकाळातील शस्त्र चालविण्याच्या कला या शस्त्र साहित्य होत. नवोदित साहित्यिकांना पुढे आणण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले पाहिजे, असेही आवाहनही त्यांनी केले. नाट्यकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते बाबुराव कोंतमवार साहित्य सन्मान पुरस्कार म्हणून ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळप्रदान करण्यात आले. याशिवाय नवोन्मेष पुरस्कार बीबी येथील कवी अविनाश पोईनकर, दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्राचार्य शिवाजी बागल आणि तु. वि. पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार गायिका सुरेखा दुधलकर यांना देऊन गौरव करण्यात आला. गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मुंबईचे कवी भगवान निळे यांच्या ‘सांगायला हवच असं नाही’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला. निळे यांच्या वतीने तो पुरस्कार पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी स्वीकारला. या प्रसंगी नाट्यकर्मी देशपांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकाशित पुस्तकांची एक माहिती पुस्तिका प्रकाशित करून त्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात उल्लेखीत पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्याचे आवाहन केले. संर्यांश पुरस्कार आयोजन समितीचे समन्वयक संजय वैद्य यांनी वैद्य कुटुंबीयांतर्फे पुढील वर्षीपासून निसर्ग कवितांसाठी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कवयित्री मनिषा साधू व अशोकसिंग ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. पुरस्कार विजेते अशोक पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, साहित्य सर्वव्यापी असते. साहित्य निर्मितीसाठी ध्यान, चिंतन, मनन करण्याची प्रवृत्ती सकारत्मक हवी. आंतरिक प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले पाहिजे. साहित्य संवेदना जन्मत:च असणे आवश्यक आहे. जे आयुष्य जगले, तेच लिहिले पाहिजे. त्यातून खरी साहित्य निर्मिती होत असते, असेही पवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दीपक शिव यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. (प्रतिनिधी )