शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य कोणाची मिरासदारी नाही

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही,...

शरदचंद्र सालफळे : सूर्यांश पुरस्कार अशोक पवारांना प्रदानचंद्रपूर : जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी केले.सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने रविवारी शामाप्रसाद मुखर्जी सहभागृहात साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सालफळे होते. विशेष अतिथी म्हणून नागपूर येथील कवयित्री मनिषा साधू उपस्थित होत्या. मंचावर प्रमुख पाहुणे नाट्यकर्मी सुनील देशपोंडे, इतिहासतज्ज्ञ अशोकसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.डॉ. सालफळे म्हणाले की, जसे वाङमयीन साहित्य असते. त्याप्रमाणे शिवकाळातील शस्त्र चालविण्याच्या कला या शस्त्र साहित्य होत. नवोदित साहित्यिकांना पुढे आणण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले पाहिजे, असेही आवाहनही त्यांनी केले. नाट्यकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते बाबुराव कोंतमवार साहित्य सन्मान पुरस्कार म्हणून ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळप्रदान करण्यात आले. याशिवाय नवोन्मेष पुरस्कार बीबी येथील कवी अविनाश पोईनकर, दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्राचार्य शिवाजी बागल आणि तु. वि. पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार गायिका सुरेखा दुधलकर यांना देऊन गौरव करण्यात आला. गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मुंबईचे कवी भगवान निळे यांच्या ‘सांगायला हवच असं नाही’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला. निळे यांच्या वतीने तो पुरस्कार पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी स्वीकारला. या प्रसंगी नाट्यकर्मी देशपांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकाशित पुस्तकांची एक माहिती पुस्तिका प्रकाशित करून त्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात उल्लेखीत पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्याचे आवाहन केले. संर्यांश पुरस्कार आयोजन समितीचे समन्वयक संजय वैद्य यांनी वैद्य कुटुंबीयांतर्फे पुढील वर्षीपासून निसर्ग कवितांसाठी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कवयित्री मनिषा साधू व अशोकसिंग ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. पुरस्कार विजेते अशोक पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, साहित्य सर्वव्यापी असते. साहित्य निर्मितीसाठी ध्यान, चिंतन, मनन करण्याची प्रवृत्ती सकारत्मक हवी. आंतरिक प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले पाहिजे. साहित्य संवेदना जन्मत:च असणे आवश्यक आहे. जे आयुष्य जगले, तेच लिहिले पाहिजे. त्यातून खरी साहित्य निर्मिती होत असते, असेही पवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दीपक शिव यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. (प्रतिनिधी )