शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

कोरपना तालुक्यातील पांढरे सोने अज्ञात रोगाने नष्ट

By admin | Updated: August 31, 2015 00:51 IST

कोरपना तालुका पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरपना तालुक्यातील बोरगाव, इरई, एकोडी, भारोसा, तामसी रिठ, सोनुर्ली, खैरगाव, तळोधी, विरुर, गाडेगाव या गावात ...

शेतकरी हवालदिल : पिकांवर झपाट्याने होत आहे रोगाचा प्रसार ंगडचांदूर: कोरपना तालुका पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरपना तालुक्यातील बोरगाव, इरई, एकोडी, भारोसा, तामसी रिठ, सोनुर्ली, खैरगाव, तळोधी, विरुर, गाडेगाव या गावात कपाशीवर अज्ञात रोगाने आक्रमण करुन संपूर्ण पीक नष्ट केले आहे. तालुक्यातील जवळपास ६०० एकर क्षेत्रावरील कापूस पीक नष्ट झाले असून या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कापसाचे उभे पीक या रोगाला बळी पडत आहे.शेतकऱ्यांच्या होत असलेल्या प्रचंड नुकसानाची नोंद प्रशासनाने आत्तापर्यंत नोंद घेतली नाही. गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व्यथा सांगितली. तातडीने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. आ. संजय धोटे, माजी आमदार वामनराव चटप यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित सर्वे करण्याची विनंती केली. मात्र आठ दिवस लोटले तरी सर्वेक्षण सुरु झालेच नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतातील उभे पीक डोळ्यासमोर वाळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, माजी अध्यक्ष प्रा. विजय आकनुरवार यांनी बोरगाव येथे रविवारी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून पिकाची पाहणी केली. या अज्ञात रोगाचा सर्वाधिक फटका बोरगावला बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जगन्नाथ गारघाटे यांचे १२ एकर, रामदास गोहोकार ११ एकर, जनार्धन नवले १० एकर, लहूजी खुजे यांचे तीन एकर, महादेव खुजे यांचे सहा एकर, सुभाष खुजे यांच्या पाच एकर क्षेत्रावरील कापूस पीक नष्ट झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी वाळलेली कापसाची झाडे काढून वखरणी केली आहे. तर काही शेतकऱ्यांना सर्वेक्षणाची प्रतीक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तूर, चणा, जवस बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी, सर्वेक्षणाकडे दुर्लक्षकृषी विभागाचा सल्ला ठरला निष्फळंकृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची पाहणी करुन या अज्ञात रोगाच्या नियंत्रणासाठी युरिया व बावीस्टीनची फवारणी करण्याचा सल्ला दिला, तेव्हा अरुण नवले यांनी त्वरित सांगितलेले औषध त्यांचेसमोरच पिकाला दिले. मात्र तरीसुद्धा कापूस पीक वाळले व नुकसान झाले. कृषी विभागाचा सल्ला निष्फळ ठरल्याचे शेतकरी सांगत आहे. यवतमाळ येथील कृषी तज्ज्ञ डॉ. सी. व्ही. पाटील यांनी बोरगावला भेट देऊन रोगग्रस्त कपाशीची पाहणी केली. मातीचे नमुने तसेच रोगग्रस्त झाडे घेऊन गेले. तपासणी अहवाल अद्यापपावेतो कळला नाही. चंद्रपूर येथील आत्माच्या कृषी तज्ज्ञ डॉ. मानकर यांनीसुद्धा भेट दिली व पाहणी केली. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरीत सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई द्यावी व तूर, चणा, जवसाचे बियाणे उपलब्ध करुन दिल्यास ते तरी पीक घेता येईल अन्यथा पेरणीची वेळ गेल्यावर काहीच फायदा होणार नाही. नैसर्गिक आपत्ती समजून प्रशासनाने दखल घेऊन तातडीने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी भारोसाचे उपसरपंच अजय बोबडे, एकनाथ गोखरे, देवराव पावडे, अरुण बोबडे, रमेश आगरे, रवींद्र आत्राम, विनोद भगत यांच्यासह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी केली आहे.