शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भाजीसाठी डाळ आणायची कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST

बल्लारपूर : तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे, जून व नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, चणाडाळ स्वस्त धान्य दुकानातून ...

बल्लारपूर : तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे, जून व नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, चणाडाळ स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आली, परंतु मागील तीन महिन्यांपासून तूरडाळ, चणाडाळ गायब झाली आहे. रेशन दुकानातून मिळणाऱ्या गहू तांदळासोबत फक्त साखर खायची काय, असा सवाल लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदारांकडे करीत आहे.

शासनाकडून रेशन दुकानदारांना अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, तसेच डाळ या अन्न-धान्याचा समावेश असताे, परंतु मागील तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानात फक्त गहू, तांदूळ व साखर मिळत आहे. मोफत मिळणारे धान्यही बंद झाले आहे. रेशन दुकानाच्या भरवशावर आपली उपजीविका करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जेवणात भाजी कोठून आणायची, अशा तक्रारी सर्वच लाभार्थी करीत आहेत.

बल्लारपूर तालुक्यात ६६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. स्वस्त दुकानातून धान्याची उचल करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३१ हजार १२३ इतकी आहेत. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील १४ हजार ४९८, तर ७ हजार ४५४ पिवळे कार्ड धारक, अंतोदयचे ७ हजार ३०७ व एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. काही शिधापत्रिकाधारक अजूनही कोरोना संकटातून निघाले नाही. रोजगाराच्या शोधात आहेत. हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्यांची तूरडाळ मिळत नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. शिवाजी वॉर्डातील एका रेशन दुकानदाराने सांगितले की, आम्हाला सतत लाभार्थ्यांकडून तूरडाळीची मागणी होत आहे, परंतु आम्ही काहीच करू शकत नाही.

कोट

शासनाच्या आदेशाने ज्या अन्नधान्याचा पुरवठा होतो, त्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देतो. तूरडाळ सध्या बंद आहे.

- संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर