शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पुरवठा विभागाचे मोफत अन्नधान्य जाते कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा ...

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा भुकेने बळी गेला आहे. मग मोफत अन्नधान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य तसेच केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

कोठारी येथे राहणाऱ्या झेलुबाई पोचू चौधरी आणि मुलगी माया मारोती पूलगमकर या दोघींचा अन्न न मिळाल्यामुळे भुकेने मृत्यू झाला. चंद्रपूर तसेच बल्लारपूरपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावात ही घटना घडली आहे. राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने गरीब तसेच गरजूंना मोफत अन्नधान्य देण्याची योजना आहे. मात्र गरजूंना हे अन्न मिळते का, हा प्रश्न आहे. खरोखरच अन्नधान्य गरिबांना मिळाले असते तर आज या दोघींचा भूकबळी गेला नसता. शासन आणि प्रशासन हे केवळ नागरिकांची दिशाभूल करीत असून कमिशनखोरीचे मोठे साटेलोटे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोठारीसारखी घटना इतर कुठेही घडू नये यासाठी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.