शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात व शहरात वाळू येते कुठून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST

दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : वाळू घाटांचा शासकीय लिलाव अद्याप झालेला नाही. मात्र, तालुक्यात व शहरात शासकीय इमारती व खासगी ...

दत्तात्रय दलाल

ब्रह्मपुरी : वाळू घाटांचा शासकीय लिलाव अद्याप झालेला नाही. मात्र, तालुक्यात व शहरात शासकीय इमारती व खासगी बांधकामे करण्याकरिता वाळू येते कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्यांची जबाबदारी शासकीय महसूल चोरी वाचविण्याची आहे, तो महसूल विभाग व अवैध वाहतुकीवर अंकुश लावण्याची जबाबदारी असलेले पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन हतबल झाले आहेत काय, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

तालुक्यातील वाळू घाटांचा मागील तीन वर्षांपासून लिलाव करण्यात आलेला नाही. तरीदेखील या काळात विविध शासकीय व खासगी बांधकामे करण्यात येत आहेत. संपूर्ण तालुक्यात व शहरातील बांधकामे करण्याकरिता नेमकी वाळू येते कुठून व कशी, असा प्रश्न आहे.

यापूर्वी महसूल विभागाने आर्थिक वर्ष २०२१-२०२२मध्ये एकूण ९ महिन्यात विविध कारवाया केलेल्या आहेत. येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आवारात अनेक दिवसांपासून वाळू साठ्यासह जप्त केलेली वाहने उभी आहेत. वाळूचा तालुक्यात व शहरात होणारा पुरवठा लक्षात घेता ही कारवाई केवळ नाममात्र करण्यात आली की काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. शिवाय पोलीस प्रशासनानेदेखील वाळू भरलेली वाहने पकडून कारवाई केली आहे.

बॉक्स

वाळू प्रकरणी तहसील कार्यालयाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून मार्च महिन्यापासून किती वाहनांवर कारवाई तथा दंडात्मक कारवाई केली. याबाबत विचारणा केली असता तहसीलदार यांना विचारून सांगतो. असे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. महसूल व पोलीस प्रशासन हतबल होऊन जर कोणतीही ठोस कारवाई करणार नसेल तर भविष्यात लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून या वाळूतस्करांच्या मुसक्या प्रशासन आवळणार काय, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.

090921\img_20210909_083308.jpg

उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाच्या आवारात जप्त केलेली वाहने