शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

लालनाला प्रकल्पाचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Updated: June 11, 2016 00:51 IST

चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी नसल्याने नेहमी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी बसतो.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष : शेतकरी सिंचनापासून वंचितखडसंगी : चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी नसल्याने नेहमी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी बसतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी व आर्थिक संकटात जगत आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी चिमूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जलसंपदा मंत्री असताना महत्त्वाकांक्षी निर्णय घेत, सिंचन विभागाकडे पाठपुरावा करीत वर्धा जिल्ह्यातील लाल नाला प्रकल्पातील पाणी आणण्याची योजना आणली. या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून अजूनही लाल नाला उपसा सिंचन प्रकल्पााचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका अशी ओळख असलेल्या चिमूर तालुक्यात २६३ गावांचा समावेश आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन पिकासह अन्य पिकांचे उत्पादन होते. तालुक्यात कोणतेही धरण नसल्याने येथील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असतात. तालुक्यात पिकाखालील क्षेत्र ६१९७२.६६ हेक्टर तर पडित क्षेत्र ५७७२.६८ हेक्टर आहे. लाल नाला प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावाजवळील नाल्यावर बांधलेला मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या एकूण ७२९० हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी ३३०८ हेक्टर कोळसा खाणी अंतर्गत येते. त्यामुळे हे क्षेत्र प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वंचित होत आहे. ३९८२ हेक्टर सिंचन क्षेत्रावर (वरोरा व हिंगणघाट तालुक्यातील कामे झाली आहेत) हे कमी होत असलेले क्षेत्र भरुन काढण्यासाठी लाल नाला प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून सिंचन योजनेद्वारे चिमूर तालुक्यातील १२ गावातील एकूण ३३०८ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.योजनेच्या पंपगृहामध्ये ३६० अश्वशक्तीचे ४ पंप प्रस्तावित आहेत. १२०० मि.मी व्यासाच्या व ५८०० मीटर लांबीच्या लोखंडी उर्ध्वनलिकेद्वारे (पाईप) आमडी बेगडे गावाजवळील वितरण कुंडामध्ये पाणी सोडण्यात येईल. या पंपाद्वारे उचललेले पाणी कालव्याद्वारे ३३०८ हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्याचे प्रस्तावित असून या सिंचनाचा लाभ चिमूर तालुक्यातील १२ गावातील आमडी बेगडे, चिचघाट, चकचिचघाट, रेंंगाबोडी, भिवकुंड, वहानगाव, मुरपार रिठ, खुर्सापार, खापरी, बोथली, खानगाव, सावरी या गावातील ३००८ हेक्टर क्षेत्रात होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून लाल नाला उपसा सिंचन प्रकल्प या महत्वाकांक्षी योजनेचे काम आमडी बेगडे या गावाजवळ येऊन थांबले आहे. त्यामुळे लाल नाला उपसा सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होवून नव्यानेच विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमाान झाले. चिमूर विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडिया निवडून आले. त्यामुळे विधानसभा क्षेत्राचे आमदार भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रकल्पाकडे लक्ष देवून कासवगतीने सुरू असलेले लाल नाला सिंचन योजनेचे काम युद्धस्तरावर पुर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याची माागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)