शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

ताडोबा एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून पॅसेंजरसह, सुपरफास्ट रेल्वे मोठ्या प्रमाणात धावत होत्या; परंतु चंद्रपूर येथे ३ मे रोजी कोरोनाचा ...

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून पॅसेंजरसह, सुपरफास्ट रेल्वे मोठ्या प्रमाणात धावत होत्या; परंतु चंद्रपूर येथे ३ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. पहिल्यांदाच रेल्वेसेवा बंद करण्यात आली. त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. याअंतर्गत बल्लारपूर जंक्शनवरून ३० ट्रेन धावत आहेत. यामध्ये जीटी, नवजीवन, दानापूर, सिकंदराबाद, केरळ, तामिळनाडू या ट्रेन धावत आहेत; परंतु मुंबई पुण्यासाठी धावणाऱ्या ट्रेन अद्यापही बंद आहेत. काजीपेठ टू पुणे, आनंदवन एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेस, बल्लारपूर सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यांना नागपूर येथे जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. त्यामुळे या ट्रेन कधी सुरू होतील, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

बॉक्स

पॅसेंजर गाड्यांचे घोडे कोठे अडले?

चंद्रपूर येथून वर्धा, नागपूर, गोंदिया अशा पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. मात्र, कोरोनापासून त्या सर्व बंद आहेत.

इतर ट्रेन सुरू केल्या असल्या तरी पॅसेंजर ट्रेन बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

या सर्व पॅसेंजर फुल्ल भरून धावत होत्या. कोरोनात गर्दी टाळण्यासाठी या ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत.

विशेष ट्रेन ज्या नियमावलीच्या आधारावर सुरू करण्यात आली त्याच आधारावर पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु एक्स्प्रेस व पॅसेंजर सुरू करण्याबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बॉक्स

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

जीटी एक्स्प्रेस

गोरखपूर एक्स्प्रेस

केरला एक्स्प्रेस

तेलंगणा एक्स्प्रेस

तामिळनाडू एक्स्प्रेस

बॉक्स

या गाड्या कधी सुरू होणार

काजीपेठ पुणे

आनंदवन एक्स्प्रेस

ताडोबा एक्स्प्रेस

बल्लारपूर सेवाग्राम

बल्लारपूर गोंदिया पॅसेंजर

बॉक्स

प्रवासी काय म्हणतात

माझी मुलगी पुण्याला राहते. त्यामुळे कधी-काळी तिच्याकडे जाणे होते; परंतु मागील दोन वर्षांपासून ट्रेनच बंद आहे. त्यामुळे नागपूरला जाऊन पुण्यासाठी ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे मोठी अडचण होते. इतर ट्रेन सुरू केल्या असताना पुण्यासाठीची ट्रेन बंद का आहे, हे कळायला मार्ग नाही.

-किशोर साहू, बल्लारपूर

------

नेहमी कामानिमित्त मूलला जाणे होते. पॅसेंजर सुरू होती तर मूल गाठणे सहज व कमी खर्चिक होते. मात्र, पॅसेंजर बंद असल्याने आता बस किंवा खासगी गाडीने जावे लागते. त्यामुळे लवकर पॅसेंजर सुरू करण्यात यावी.

-गौतम काकडे, बल्लारपूर