शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 01:30 IST

तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते.

जनतेचा सवाल : दोन वर्षांपासून काळोखाचे साम्राज्य तळोधी (बा) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तळोधी (बा.) येथील बसस्थानकावरील संपूर्ण ४८ पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस बसस्थानकावर पूर्णत: काळोख असतो. पथदिवे केव्हा सुरू करणार, याकडे जनतेने लक्ष वेधले आहे. तळोधी (बा.) ह्या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या गावाला एका छोट्या शहराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथे सर्व सुविधा असल्याने तळोधी (बा) हे शहर तालुक्याच्या उंबरठ्यावर आहे. या गावाचा आजु-बाजूच्या ४२ गावांशी दररोजचा संबध येत असतो. तळोधी (बा.) येथे मोठा बाजार भरतो. त्याला परिसरातील गावांचे नागरिक येत असतात. या बाजारीकरणाच्या दृष्टिकोनातून लोकांची रेलचेल होत असते. याठिकाणी अनेक शाळा- महाविद्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्यगंज, पोलीस स्टेशन व अनेक शासकीय कार्यालये आहेत. तळोधी (बा) बसस्थानकावर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दुभाजक व पथदिवे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. ती कामे पूर्ण करण्यात आली. त्यावेळी दोन-तीन वर्षे बसस्थानकावर रोषणाई दिसत होती. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून एक-एक पथदिवे बंद होत गेले. ते पथदिवे बदलण्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले. बसस्थानकापासून काही अंतरावर साई मंदिर व पोलीस ठाणे आहे. या मार्गाने सुसाट वेगाने गाड्या धावत असतात. त्यामुळे अनेकवेळा दुभाजकावरील खांबाला मोठ्या वाहनाने धडक देऊन अपघात झाले. तसेच साई मंदिरासमोरील खांबाला ट्रकने धडक दिली असता ट्रक चालकाकडून नुकसान भरपाई घेण्यात आली. मात्र अजूनपर्यंत खांबावर पथदिवे लावण्यात आले नाही. या मार्गावर पथदिवे बंद असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर साप-विंचू मार्गक्रमण करीत असतात. त्यावेळी अनेक साईभक्तांना व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. तळोधी (बा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे लोकांना बसस्थानकावर रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी निर्देश देऊन त्वरित पथदिवे सुरू करावे, अशी मागणी तळोधी (बा) येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)