शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 01:30 IST

तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते.

जनतेचा सवाल : दोन वर्षांपासून काळोखाचे साम्राज्य तळोधी (बा) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तळोधी (बा.) येथील बसस्थानकावरील संपूर्ण ४८ पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस बसस्थानकावर पूर्णत: काळोख असतो. पथदिवे केव्हा सुरू करणार, याकडे जनतेने लक्ष वेधले आहे. तळोधी (बा.) ह्या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या गावाला एका छोट्या शहराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथे सर्व सुविधा असल्याने तळोधी (बा) हे शहर तालुक्याच्या उंबरठ्यावर आहे. या गावाचा आजु-बाजूच्या ४२ गावांशी दररोजचा संबध येत असतो. तळोधी (बा.) येथे मोठा बाजार भरतो. त्याला परिसरातील गावांचे नागरिक येत असतात. या बाजारीकरणाच्या दृष्टिकोनातून लोकांची रेलचेल होत असते. याठिकाणी अनेक शाळा- महाविद्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्यगंज, पोलीस स्टेशन व अनेक शासकीय कार्यालये आहेत. तळोधी (बा) बसस्थानकावर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दुभाजक व पथदिवे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. ती कामे पूर्ण करण्यात आली. त्यावेळी दोन-तीन वर्षे बसस्थानकावर रोषणाई दिसत होती. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून एक-एक पथदिवे बंद होत गेले. ते पथदिवे बदलण्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले. बसस्थानकापासून काही अंतरावर साई मंदिर व पोलीस ठाणे आहे. या मार्गाने सुसाट वेगाने गाड्या धावत असतात. त्यामुळे अनेकवेळा दुभाजकावरील खांबाला मोठ्या वाहनाने धडक देऊन अपघात झाले. तसेच साई मंदिरासमोरील खांबाला ट्रकने धडक दिली असता ट्रक चालकाकडून नुकसान भरपाई घेण्यात आली. मात्र अजूनपर्यंत खांबावर पथदिवे लावण्यात आले नाही. या मार्गावर पथदिवे बंद असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर साप-विंचू मार्गक्रमण करीत असतात. त्यावेळी अनेक साईभक्तांना व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. तळोधी (बा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे लोकांना बसस्थानकावर रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी निर्देश देऊन त्वरित पथदिवे सुरू करावे, अशी मागणी तळोधी (बा) येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)