शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:13 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षक बनने ठरत आहे दिवास्वप्न : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यातही शासनाने शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. त्यातही शासनाने टीईटीधारकांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. पदवीकाधारकांनी ती परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही भरती प्रकिया होत नसल्यामुळे पदवीकाधारकांचे शिषक बनण्याचे स्वप्न भंग होत आहे.पवित्र पोर्टल ठरतेय डोकेदुखीशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी २० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पदवीकाधारकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यासाठी पवित्र पोर्टवरल अर्ज करायचे होते. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केले. मात्र अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांची अर्जाची पत्र निघाली नाही. त्यानंतर अर्जाची पत्र काढण्यासाठी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी रोल नंबरनुसार कालावधी देण्यात आला. यामध्ये अनेकांनी दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती झाली नाही. तसेच अर्जाची पत्रही निघाली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा केवळ घोषणाबाजीतर नाहीना असा प्रश्न पदविकाधारकांना पडत आहे.खासगी शाळेत लाखोंची रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधारक ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.