शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:13 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षक बनने ठरत आहे दिवास्वप्न : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यातही शासनाने शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. त्यातही शासनाने टीईटीधारकांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. पदवीकाधारकांनी ती परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही भरती प्रकिया होत नसल्यामुळे पदवीकाधारकांचे शिषक बनण्याचे स्वप्न भंग होत आहे.पवित्र पोर्टल ठरतेय डोकेदुखीशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी २० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पदवीकाधारकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यासाठी पवित्र पोर्टवरल अर्ज करायचे होते. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केले. मात्र अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांची अर्जाची पत्र निघाली नाही. त्यानंतर अर्जाची पत्र काढण्यासाठी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी रोल नंबरनुसार कालावधी देण्यात आला. यामध्ये अनेकांनी दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती झाली नाही. तसेच अर्जाची पत्रही निघाली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा केवळ घोषणाबाजीतर नाहीना असा प्रश्न पदविकाधारकांना पडत आहे.खासगी शाळेत लाखोंची रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधारक ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.