शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
4
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
5
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
6
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
7
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
8
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
9
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
10
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
11
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
12
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
13
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
14
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
15
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
16
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
17
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
18
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
19
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
20
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

भावी शिक्षकांची परवड कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:13 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षक बनने ठरत आहे दिवास्वप्न : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही शासनाने शिक्षकभरतीसाठी टीईटी उत्तीर्ण परिक्षार्थ्यांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. मात्र अद्यापही कोणतीही भरतीची प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे पदवीकाधारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यातही शासनाने शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. त्यातही शासनाने टीईटीधारकांसाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी सुरु केली. पदवीकाधारकांनी ती परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र अद्यापही शासनाकडून कोणतीही भरती प्रकिया होत नसल्यामुळे पदवीकाधारकांचे शिषक बनण्याचे स्वप्न भंग होत आहे.पवित्र पोर्टल ठरतेय डोकेदुखीशासनाने मागील काही महिन्यांपूर्वी २० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे पदवीकाधारकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यासाठी पवित्र पोर्टवरल अर्ज करायचे होते. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केले. मात्र अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांची अर्जाची पत्र निघाली नाही. त्यानंतर अर्जाची पत्र काढण्यासाठी व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी रोल नंबरनुसार कालावधी देण्यात आला. यामध्ये अनेकांनी दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती झाली नाही. तसेच अर्जाची पत्रही निघाली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा केवळ घोषणाबाजीतर नाहीना असा प्रश्न पदविकाधारकांना पडत आहे.खासगी शाळेत लाखोंची रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधारक ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.