शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भ्रष्टाचारासंबंधी कारवाई केव्हा होणार ?

By admin | Updated: March 28, 2016 01:00 IST

तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.

बी.यू.बोर्डेवार/शंकर मडावी ल्ल राजुरातालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे भेंडवीचे ग्रामवासी आनंद गेडाम व गावातील नागरिक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून निवेदन देणार आहे.राजुरा तालुक्यातील भेंडवी गावात फेरफटका मारला असता गावातील नागरिकांनी गावाच्या समस्या पत्रकारांसमक्ष मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ५८ लाखांची पाण्याची टाकी मागील दोन वर्षापासून धूळ खात आहे. राजुरा येथील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकी बांधकाम करताना रोख पुस्तकात अजूनही नोंदी नाही. रोख पुस्तक कोरे आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. अजूनपर्यत ही पाण्याची टाकी ग्रामवासीयांना हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे येथील महिला पाण्यासाठी त्रस्त आहेत.या ठिकाणी अंबुजा फाऊंडेशनने एक बंधारा बांधला. त्या बंधाऱ्याला लोखंडी दारच नाही. या बंधाऱ्याच्या बाजुला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजना राजुरा तालुक्यात राबविण्यात आली. ती योजना रोजगार हमी अर्धे-तुम्ही अर्धे आम्ही या प्रमाणेच असून वृक्ष नसताना वृक्षाच्या देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीने केलेला आहे. सोलर लाईट, टावर बंद पडलेले असून शौचालय तयार करण्यासाठी आणलेल्या विटा धूळ खात पडलेल्या आहे. अस्वच्छ नाल्या असून आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेली नाही. या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या. शासकीय अधिकारी यांनी अहवाल दिला. परंतु राजुराचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनपर्यंत तक्रार झालेली नाही. राजुराचे संवर्ग विकास अधिकारी अहवाल पाठवून मोकळे झाले. चंद्रपूरचे संबंधित अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करू, असे पोलीस अधिकारी म्हणतात. लाखोंचा भ्रष्टाचार होवूनही कारवाई होत नसल्याचे पाहून गावातील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत.पोलीस पाटलांवरच आहेत गुन्हे दाखलराजुरा : पोलीस पाटील पोलिसांची व त्या गावाची चांगली प्रतिमा सांभाळीत असतो. परंतु पोलीस पाटलावरच गुन्हे दाखल असेल तर ते गावाला काय न्याय देणार. अशीच परिस्थिती भेंडवीत आहे. त्यांना पोलीस पाटील करू नये, यासाठी येथील १०० नागरिकांनी तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की संतोष सलाम यांच्यावर गुन्हे दाखल असून अशा व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नियुक्ती केल्यास गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊन गावातील वातावरण दूषित होईल. आनंद गेडाम, भगवान मडावी, सुभाष उईके, सुनीता गेडाम, शशिकला परचाके, पुष्पा गेडाम, जंगुबाई मंगाम यासह शंभर नागरिकांनी तक्रार करूनही संतोष सलाम हे पोलीस पाटील नियुक्त झाले. या पोलीूस पाटलावर भादंवी ४२०, ४६८, ४७१, २०० अन्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा भादंवीच्या ५०९, २९४, ५०६, ३२३, १४३, १४७, ४२७, २९४, ६०६, १४३, ४७७, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातून ते निर्दोष मुक्त झाले. या तक्रारीमध्ये जातीचा घोळ असल्याचेसुद्धा म्हटले आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीस पाटील कसे नियुक्त केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेसुध्दा २४ नोव्हेंबर २०१५ ला याची रितसर तक्रार करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत साधी चौकशीही झाली नाही, या बद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.