शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे चाक मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी काही अटींवर मोठे उद्योग सुरू ठेवण्यास राज्य सरकारने ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी काही अटींवर मोठे उद्योग सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र, मागील वर्षापासून सतत नुकसानीचा फटका भोगणाऱ्या ग्रामीण व तालुका स्थळावरील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची चाके मंदावली आहेत. त्यामुळे रोजगाराविना कामगार व सुशिक्षित बेरोजगारांचे हाल होत आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार २८६ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे यातील सुमारे दीड हजार उद्योगांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. निर्बंध उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले तर नुकसानीचे भीषण चित्र पुढे येऊ शकते. मोठ्या उद्योगांनी निर्बंधाच्या काळातही उत्पादनासाठी कच्चा मालाची आयात करीत आहेत. पण, लहान उद्योगचालकांना हा खर्च परवडत नाही. चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या २० पैकी १६ उद्योग सुरू आहेत. कंपन्यांनीही कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या. यातील बरेच कामगार स्थायी आहेत. अनेकांना कामगार कायद्याअंतर्गत सोयीसवलती मिळतात. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या उद्योगांची रोजगार पुरविण्याची क्षमता कमीच आहे. सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत लादलेल्या निर्बंधांंमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा कोटींच्या व्यवहाराला मोठा फटका बसल्याचा अंदाज सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

कच्चा माल व उत्पादन साखळी विस्कळीत

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात ५५ ते ६० हजार असंघटित कामगारांना रोजगार मिळतो. यामध्ये कृषी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धन प्रक्रिया उद्योगांचाही समावेश आहे. पण, कच्चा माल व उत्पादनाची साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे या उद्योगांची चाके बंद पडली. परिणामी, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. विक्रीअभावी भाजीपाला उत्पादकांचेही अर्थकारण कोलमडले आहे.

उद्योजक म्हणतात...

गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील उद्योग संकटात आहेत. उत्पादन झाले तर विक्री नाही आणि व्रिकी झाल्यास वसुली नाही, अशा दुष्टचक्रात उद्योजक सापडले आहेत. अशा परिस्थिती शासनाने पुन्हा निर्बंध सुरू झाले. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उद्योगांचाही पाठिंबा आहे. मात्र, सरकारने आर्थिक तरतूद केली पाहिजे.

-मधुसूदन रुंग्ठा, अध्यक्ष, एमआयडीसी, चंद्रपूर

तालुकास्थळावरील लघु उद्योगांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. खरे तर या उद्योगावर निर्भर असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. परंतु, वाहतूक, कच्चा माल, उत्पादन, विक्रीबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या. स्थिती केव्हा सुधारेल, याचीच आम्ही वाटत पाहत आहोत.

-राहुल वेगीनवार, चंद्रपूर

कोरोना साखळी तोडण्यासाठी जीवनाश्यक वस्तुंची दुकाने वगळता कापड व अन्य दुकाने १५ मेपर्यंत बंद आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. गतवर्षी झालेले नुकसान भरून निघाले नसताना पुन्हा ही आपत्ती आली आहे.

-शंकर अग्रवाल, चंद्रपूर

मी एमआयडीसीत कंत्राटी काम करीत होतो. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आठवड्यातून व पक्त तीन दिवस कामावर बोलाविल्या जात आहे. आधीच मजुरी जास्त नाही. शहरात दुसरे काम नाही. त्यामुळे सध्या ट्रालीवर फिरून शहरात फळे विकून कुटुंब चालवित आहे.

- फारूख पठाण, रहमतनगर, चंद्रपूर

उद्योगांसाठी कर्ज घेणारे चिंतित

जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून कर्ज घेतले आहे. बऱ्याच जणांनी स्वयंरोजगारासाठी खासगी बँकांकडून भांडवल उभारले. सध्या हे उद्योग संकटात सापडले आहेत. कोरोना केव्हा जाणार याची काही खात्री नाही. त्यामुळे कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

तालुकानिहाय सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग व सुरू उद्योग टक्के

वरोरा १३५

चिमूर ११०

नागभीड ११७

बल्लारपूर १५१

सावली ३०

सिंदेवाही ५१

भद्रावती ११४

चंद्रपूर १५६८

मूल ६१६

पोंभुर्णा ७५

ब्रह्मपुरी १०४

कोरपना ६२

राजुरा ७४

गोंडपिपरी १३

जिवती ३६