शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एसटीतील एक हजार संपकऱ्यांचे पुढे काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळला शासकीय विलीनीकरण करण्याची शक्यता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मावळली. सध्या २०० कर्मचारी कार्यरत आहेत. संपकरी एक हजार कर्मचारी २२ एप्रिल २०२२ पर्यंत रुजू न झाल्यास त्यांना सेवामुक्त करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे  हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. ११८  कर्मचाऱ्यांचे निलंबन केले, तर ४८ कर्मचाऱ्यांची बदली केली. परंतु, तरीही कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. 

१००० कर्मचारी संपात

- जिल्ह्यातील सर्व आगारातून एक हजार कर्मचारी अजूनही संपावर आहेत. एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरण अशक्य असल्याचे सरकारने उच्च न्यायालयात  सांगितले. त्यावर न्यायालयाने उपजीविकेचे नुकसान करू नका, अशा सूचना संपकऱ्यांना केल्या. २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचेही कर्मचाऱ्यांना कळविले.

 १२५ बसेसवरच मदार - संप सुरूच असल्याने सध्या १२५ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविले जात आहे. हे बसेस प्रामुख्याने मुख्य मार्गावर जाणारे आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही बसेस सोडल्या जात नाही. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

जिल्ह्यातील ८० बसेस बंद- बसफेऱ्या सुरळीत करण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत ५० कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.-  हे कर्मचारी रुजू झाले. मात्र,अजूनही ८० बसेस बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर झाली नाही.

 उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर प्रवाशांना सेवा देणे सुरू आहे. प्रवाशांची कोणतीही अडचण होऊ नये, यादृष्टीने नियोजन करून अंमलबजावणी केली जात आहे.- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतून निरीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप