शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दारूबंदी असताना समितीची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:25 IST

गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण .....

ठळक मुद्देवहाणगाववासीयांचा पोलिसांना सवाल : पोलीस आल्यापावली परतले

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. या ग्रामसभा ठरावाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७.३० वाजता शेगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी दारूबंदी समितीच्या गठित करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र उपसरपंच प्रशांत कोल्हे व नागरिकांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात दारूबंदी समितीची गरज का? असा सवाल केल्याने ठाणेदारांना वहाणगावातून आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही वहाणगावात मुबलक प्रमाणात दारूची विक्री होते. त्यामुळे वहाणगावात परिसरातील अनेक गावातील तडीराम आपली लत भागवण्यासाठी वहाणगावचा रस्ता धरतात. या तडीरामांमुळे गावातील विद्यार्थिनी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या त्रासाला कंटाळून गावातील अवैध दारू हद्दपार करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले व अवैध दारूबाबत प्रशासनाच्या ठोस धोरणाचा अभावामुळे गावातील महिलांनी प्रशासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टीने अभिनव आंदोलन उभे केले. २ सप्टेंबरला ग्रामसभेत एकमताने ग्रामपंचायतीने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव पारीत केला व दारूबंदीला चांगलीच चपराक दिली. या ग्रामसभेच्या ठरावामुळे वहाणगाव एकाच दिवशी राज्याच्या पटलावर गाजले.मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या विषयावरून वहाणगावात सुरू असलेल्या अभिनव आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन ढवळून निघाले आहे. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष बारसे आपल्या ताफ्यासह वहाणगावात दारूबंदी समिती गठित करण्यासाठी आले. सभेकरिता उपसरपंच प्रशांत कोल्हे, सचिन डी.पी. डाखोरे यांच्यासह ६० नागरिक उपस्थित होते.शासनाच्या भूमिकेशिवाय गावकºयांचे सहकार्य नाहीठाणेदार सुभाष बारसे यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामवासीयांची मदत गरजेची आहे. त्यादृष्टीने दारूबंदी समिती गठित करण्यास सुरूवात केली. मात्र उपसरपंच व गावकºयांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना समितीची गरज काय? गावकºयांनी दारू सुरू करण्याबाबत ठराव घेतला असून शासन जेव्हापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत गावकरी सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ठाणेदारासह पोलीस प्रशासनाला आल्यापावली वहाणगाव येथून परत जावे लागले आहे. त्यामुळे वहाणगावबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.