शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असताना समितीची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:25 IST

गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण .....

ठळक मुद्देवहाणगाववासीयांचा पोलिसांना सवाल : पोलीस आल्यापावली परतले

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. या ग्रामसभा ठरावाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७.३० वाजता शेगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी दारूबंदी समितीच्या गठित करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र उपसरपंच प्रशांत कोल्हे व नागरिकांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात दारूबंदी समितीची गरज का? असा सवाल केल्याने ठाणेदारांना वहाणगावातून आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही वहाणगावात मुबलक प्रमाणात दारूची विक्री होते. त्यामुळे वहाणगावात परिसरातील अनेक गावातील तडीराम आपली लत भागवण्यासाठी वहाणगावचा रस्ता धरतात. या तडीरामांमुळे गावातील विद्यार्थिनी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या त्रासाला कंटाळून गावातील अवैध दारू हद्दपार करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले व अवैध दारूबाबत प्रशासनाच्या ठोस धोरणाचा अभावामुळे गावातील महिलांनी प्रशासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टीने अभिनव आंदोलन उभे केले. २ सप्टेंबरला ग्रामसभेत एकमताने ग्रामपंचायतीने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव पारीत केला व दारूबंदीला चांगलीच चपराक दिली. या ग्रामसभेच्या ठरावामुळे वहाणगाव एकाच दिवशी राज्याच्या पटलावर गाजले.मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या विषयावरून वहाणगावात सुरू असलेल्या अभिनव आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन ढवळून निघाले आहे. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष बारसे आपल्या ताफ्यासह वहाणगावात दारूबंदी समिती गठित करण्यासाठी आले. सभेकरिता उपसरपंच प्रशांत कोल्हे, सचिन डी.पी. डाखोरे यांच्यासह ६० नागरिक उपस्थित होते.शासनाच्या भूमिकेशिवाय गावकºयांचे सहकार्य नाहीठाणेदार सुभाष बारसे यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामवासीयांची मदत गरजेची आहे. त्यादृष्टीने दारूबंदी समिती गठित करण्यास सुरूवात केली. मात्र उपसरपंच व गावकºयांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना समितीची गरज काय? गावकºयांनी दारू सुरू करण्याबाबत ठराव घेतला असून शासन जेव्हापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत गावकरी सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ठाणेदारासह पोलीस प्रशासनाला आल्यापावली वहाणगाव येथून परत जावे लागले आहे. त्यामुळे वहाणगावबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.