शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निरपराध्याला मारहाण करणारी ही कसली मानसिकता?

By admin | Updated: September 4, 2015 00:56 IST

गुन्हेगारांवर अंकुश ठेवून निरपराध आणि सामान्य जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे पोलिसांकडून अपेक्षीत आहे.

व्यापाऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया : ‘त्या’ पोलिसांवर गुन्हे नोंदवा, निलंबन कराचंद्रपूर : गुन्हेगारांवर अंकुश ठेवून निरपराध आणि सामान्य जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे पोलिसांकडून अपेक्षीत आहे. मात्र, कसलिही चौकशी न करता निरपराध्याला थेट गुरासारखे बदडून काढणे ही पोलिसांची कसली मानसिकता, असा प्रश्न युवा व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर चंद्रपुरात उपस्थित होत आहे.रोहित बोथरा या व्यापारी युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यापासून समाजमनात तिव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चेम्बर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी म्हणाले, एखाद्याला कुण्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली तर त्याला खरच मारहाण केली जाते का, असा प्रश्न आहे. येथे तर एका निरपराध माणसाला अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या पोलिसांनी हा गुन्हा केला त्या पोलिसांवर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, सदानंद खत्री म्हणाले, जे प्रकरण घडले, ते केवळ आता एकट्या रोहीत बोथरा या व्यापारी युवकाचे राहील नसून शहरातील सर्व व्यापारी, सामान्य नागरिकांचे झाले आहे. पोलिसांचे काम सामान्यांचे रक्षण करणे आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. चंद्रपुरात मात्र उलटे घडले. ही बाब सामान्यांसाठी बरी नव्हे. अशा घटना वारंवार घडू नये, निरपराध माणसाला अशा पद्धतीने अमाणूषपणे मारहाण केली जाऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.उपाध्यक्ष रामकिशोर सारडा म्हणाले, पोलिसांच्या हातून अतिशय चुकीचे काम घडले आहे. शहरात दारूबंदीच्या नावावर काय सुरू आहे, ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे एखाद्या निरपराधाला पकडून तू दारू तस्करी करतो आहे, असा ठपका ठेऊन त्याला मारहाण करणे, ही बाब निश्चितच कायद्यात बसणारी नाही. त्यामुळे या प्रकरणात समाधानकारक कारवाई अपेक्षित आहे.उपाध्यक्ष विनोद बजाज म्हणाले, एखाद्याला संशयित म्हणून पकडल्यानंतर खरे तर त्याला विचारपूस करणे गरजेचे होते. मात्र संबंधिताला त्याची बाजू मांडू देण्याची कोणतीही संधी न देता त्याला एखाद्या गुन्हेगारासाठी मारहाण करणे, हे कितपत संयुक्तिक आहे. या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास करून कठोर कारवाई व्हायला हवी.व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार म्हणाले, एखाद्या असहाय्य सामान्य माणसाला पोलिसांनी किती मारावे, याची काही मर्यादा असावी की नाही. पोलिसांनी जे केले ते अतिशय चुकीचे आणि सामान्यांना संताप आणणारे आहे. विविध संघटनांचा निषेध मोर्चाकोणताही अपराध नसताना रोहीतला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी विविध संघटनांच्या सहभागात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, गुजराती समाज, चंद्रपूर सर्कल बिल्डर, पूज्य सिंघी पंचायत, फुटवेअर असोसिएशन, वर्धमान स्थानक समाज, झेरॉक्स संघटना, आर्य वैश्य संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, चंद्रपूर कपडा असोसिएशन, रेडिमेड होजिअरी, पंजाबी सेवा समिती, माहेश्वरी सेवा समिती, प्लायवूड असोसिएशन, कोल असोसिएशन, चंद्रपूर बचाव सेवा समिती आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना निवेदन सादर केले. यावेळी चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, सदानंद खत्री, रामजीवन परमार, दामोदर मंत्री, रामकिशोर सारडा, हरिष गिडवाणी, घनश्याम दरबार, कुक्कू साहनी, रमेश बोथरा, विनोद बजाज, रामू तिवारी, मुन्ना भंडारी, सत्यम सोनी, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार, जितू चोरडीया, नरपत भंडारी, गोविंद सारडा, मुन्ना चांडक, जितेंद्र जोगड, श्रीचंद हसानी, राजेश पटेल, शिवन हासानी, प्रशांत बैद, दिनेश बजाज, अमर गांधी, महेंद्र मडलेचा, राजेंद्र लोढा, पिंटू मंत्री, देवेंद्र मांडवीया, राजेश डागा, सुनिल कारिया, संदीप माहेश्वरी, अमित नथवानी, नितीन पुगलिया, विवेक जैन यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.