शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणविरोधातील लढा एकाकी का?

By admin | Updated: June 11, 2017 00:27 IST

चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत.

काही सामाजिक संस्थांनी केला संघर्षप्रदूषण कमी झाले नाही; तरीही उद्योगबंदी उठविलीनागरिकांच्या संघर्षाला प्रशासनाची साथ नाहीरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत. आजच्या परिस्थितीत प्रदूषण हे जिल्ह्यातील सर्वाधिक ज्वलंत आणि गंभीर समस्या आहे. तरीही ही समस्या सोडविण्यासाठी पाहिजे तशी व्यापक लोकचळवळ निर्माण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील काही सामाजिक संस्था, पर्यावरणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी या विरोधात आवाज उठविला. अत्यंत ताकदीनिशी लढाही दिला. मात्र त्यांच्या लढ्याला नागरिकांची आणि प्रशासनाची साथ मिळाली नाही. समस्त जिल्हावासीयांचा हा प्रश्न असताना त्यांचा लढा एकाकी का पडला, यावर विचारमंथन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. राज्यात कुठेही गेले आणि चंद्रपूरचे नाव घेतले की सर्वप्रथम येथील प्रदूषणच लोकांच्या डोळ्यासमोर येते. या भूमीची एवढी भिषण स्थिती उद्योगांनी करुन टाकली आहे. या उद्योगांनी स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार दिला, हे मान्य आहे. मात्र त्या मोबदल्यात नागरिकांकडून काय काय हिसकावून घेतले जात आहे, हे त्यांना जडलेल्या आजारांवरून स्पष्ट होते. प्रदूषणाची हीच स्थिती कायम राहिली तर ज्या झपाट्याने येथील लोकसंख्या वाढली, त्याच झपाट्याने ती कमी होण्यास वेळ लागणार नाही. जिल्ह्यात एकूण ७५० लहानमोठे उद्योग आहेत. यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकताहेत. १५० उद्योग तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेत सर्वाधिक प्रदूषण करणारे आहेत. जिल्ह्यातील वर्धा, इरई, झरपट या नद्या वेकोलिच्या कोळसा खाणी, रासायन तयार करणारे कारखाने, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमुळे प्रदूषित झाल्या आहेत. कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. वाढते कारखाने, वाहनांची संख्या, डिजेचे फॅड यामुळे ध्वनी प्रदूषणही आता डोके वर काढू लागले आहे. हे वाढते प्रदूषण थांबविण्यासाठी आजवर कुणीच काही केले नाही, असे नाही. या प्रदूषणाने अनेकांना अस्वस्थ केले आहे. ग्रिन प्लॅनेट सोसायटी, इको-प्रो, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, वृक्षाई यासारख्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात जनआंदोलन उभे केले. प्रसंगी स्वत: पुढाकार घेत प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या. प्रशासनाशी दोन हात करण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्या प्रयत्नांना काही ठिकाणी यशही आले. मात्र प्रदूषणाची ही समस्या मुळासकट नष्ट करण्याइतपत त्यांचा हा संघर्ष नागरिक आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व्यापक ठरू शकला नाही. त्यामुळे आजतरी हा संघर्ष व्यापक आणि अत्यंत दमदारपणे सुरू होणे गरजेचे आहे. इको-प्रोची चळवळइको-प्रो संस्थेने विवीध अभियान, उपक्रम राबवून, प्रसंगी आंदोलनांचा मार्ग पत्करून शहरातील प्रदूषणाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील आॅयर्न ओअर व सिमेंटचे लोंडीग-अनलोंडीगमुळे शहराच्या मध्यभागी मोठया प्रमाणात प्रदूषण होत होते. या प्रदुषण विरोधात संस्थेने विवीध आंदोलने केली. यात संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहनंतर सदर मालधक्कावरील सिंमेट व आयर्न ओअरचे लोंडीग-अनलोंडीग बंद करण्यात आले. रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करण्यासाठी संघर्ष केला. रॉकेलवर चालणाऱ्या आॅटोमुळे होणारे प्रदूषण बंद करायला लावले. या संदर्भात इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, चंद्रपूर वीज केंद्राच्या जलप्रदुषणसंदर्भात बरेचदा पाठपुरावा करूनही सुधारणा होताना दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडुन केवळ बॅक गॅरंटी जप्त करणे ही एकमेव कार्यवाही केली जाते.