शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

प्रदूषणविरोधातील लढा एकाकी का?

By admin | Updated: June 11, 2017 00:27 IST

चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत.

काही सामाजिक संस्थांनी केला संघर्षप्रदूषण कमी झाले नाही; तरीही उद्योगबंदी उठविलीनागरिकांच्या संघर्षाला प्रशासनाची साथ नाहीरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत. आजच्या परिस्थितीत प्रदूषण हे जिल्ह्यातील सर्वाधिक ज्वलंत आणि गंभीर समस्या आहे. तरीही ही समस्या सोडविण्यासाठी पाहिजे तशी व्यापक लोकचळवळ निर्माण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील काही सामाजिक संस्था, पर्यावरणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी या विरोधात आवाज उठविला. अत्यंत ताकदीनिशी लढाही दिला. मात्र त्यांच्या लढ्याला नागरिकांची आणि प्रशासनाची साथ मिळाली नाही. समस्त जिल्हावासीयांचा हा प्रश्न असताना त्यांचा लढा एकाकी का पडला, यावर विचारमंथन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. राज्यात कुठेही गेले आणि चंद्रपूरचे नाव घेतले की सर्वप्रथम येथील प्रदूषणच लोकांच्या डोळ्यासमोर येते. या भूमीची एवढी भिषण स्थिती उद्योगांनी करुन टाकली आहे. या उद्योगांनी स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार दिला, हे मान्य आहे. मात्र त्या मोबदल्यात नागरिकांकडून काय काय हिसकावून घेतले जात आहे, हे त्यांना जडलेल्या आजारांवरून स्पष्ट होते. प्रदूषणाची हीच स्थिती कायम राहिली तर ज्या झपाट्याने येथील लोकसंख्या वाढली, त्याच झपाट्याने ती कमी होण्यास वेळ लागणार नाही. जिल्ह्यात एकूण ७५० लहानमोठे उद्योग आहेत. यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकताहेत. १५० उद्योग तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेत सर्वाधिक प्रदूषण करणारे आहेत. जिल्ह्यातील वर्धा, इरई, झरपट या नद्या वेकोलिच्या कोळसा खाणी, रासायन तयार करणारे कारखाने, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमुळे प्रदूषित झाल्या आहेत. कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. वाढते कारखाने, वाहनांची संख्या, डिजेचे फॅड यामुळे ध्वनी प्रदूषणही आता डोके वर काढू लागले आहे. हे वाढते प्रदूषण थांबविण्यासाठी आजवर कुणीच काही केले नाही, असे नाही. या प्रदूषणाने अनेकांना अस्वस्थ केले आहे. ग्रिन प्लॅनेट सोसायटी, इको-प्रो, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, वृक्षाई यासारख्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात जनआंदोलन उभे केले. प्रसंगी स्वत: पुढाकार घेत प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या. प्रशासनाशी दोन हात करण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्या प्रयत्नांना काही ठिकाणी यशही आले. मात्र प्रदूषणाची ही समस्या मुळासकट नष्ट करण्याइतपत त्यांचा हा संघर्ष नागरिक आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व्यापक ठरू शकला नाही. त्यामुळे आजतरी हा संघर्ष व्यापक आणि अत्यंत दमदारपणे सुरू होणे गरजेचे आहे. इको-प्रोची चळवळइको-प्रो संस्थेने विवीध अभियान, उपक्रम राबवून, प्रसंगी आंदोलनांचा मार्ग पत्करून शहरातील प्रदूषणाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील आॅयर्न ओअर व सिमेंटचे लोंडीग-अनलोंडीगमुळे शहराच्या मध्यभागी मोठया प्रमाणात प्रदूषण होत होते. या प्रदुषण विरोधात संस्थेने विवीध आंदोलने केली. यात संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहनंतर सदर मालधक्कावरील सिंमेट व आयर्न ओअरचे लोंडीग-अनलोंडीग बंद करण्यात आले. रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करण्यासाठी संघर्ष केला. रॉकेलवर चालणाऱ्या आॅटोमुळे होणारे प्रदूषण बंद करायला लावले. या संदर्भात इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, चंद्रपूर वीज केंद्राच्या जलप्रदुषणसंदर्भात बरेचदा पाठपुरावा करूनही सुधारणा होताना दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडुन केवळ बॅक गॅरंटी जप्त करणे ही एकमेव कार्यवाही केली जाते.