शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

नीट न देता मेडिकल प्रवेश, तज्ज्ञ व विद्यार्थ्यांना काय वाटते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात ...

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका सदस्याने विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नीट परीक्षा घेतली पाहिजे, अशी भूमिका काही शिक्षकांनी मांडली. बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवनशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांचाही विचार करण्याची गरज अधोरेखित केली. काही विद्यार्थ्यांनी नीट व सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

बॉक्स

तामिळनाडू सरकारने पारित केले विधेयक

नीट परीक्षेच्या कारणामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा घेऊ नये, असा पवित्रा तेथील राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या भूमिकेला पालक व विद्यार्थ्यांनी समर्थन दिले. विरोधी राजकीय पक्षही विधेयकाच्या बाजूने आहेत.

तामिळनाडू सरकारने नीट परीक्षेबाबत विधेयक पारित केल्याने तेथील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज उरली नाही. अशी जोरदार मागणीही त्या राज्यातील विद्यार्थी केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहेत.

कोट

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नीटचा अभ्यासक्रम आव्हानात्मक आहे.

मेडिकल शिक्षण महागडे आहे. मेडिकल प्रवेशासाठी बारावी परीक्षेच्या निकालावर गुणवत्तेची योग्य चाळणी होणार नाही. त्यामुळे नीट रद्द करायची असेल तर अशी एखादी परीक्षा राज्य स्तरावर बोर्डाच्या आधारावर घेतल्यास योग्यच होईल. यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

-विजय बदखल, संचालक, इन्सपायर, चंद्रपूर

कोट

आता स्पर्धा वाढली आहे. नीट परीक्षा घ्यायला हरकत नाही. मात्र, कोरोना काळाचा अपवादवगळता बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरही मेडिकलला प्रवेश देण्यास हरकत नाही.

-दिलीप झाडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, चंद्रपूर.

विद्यार्थी काय म्हणतात...

बारावीच्या आधारे मेडिकल प्रवेश दिला तर गुण तसेच आरक्षणाचा काही गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो.

- श्रीधर मालेकर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर

मेडिकल अभ्यासक्रमात प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी केवळ बारावीतील गुणांचा विचार करणे पुरेसे नाही.

-मालती कावळे, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर