शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नीट न देता मेडिकल प्रवेश, तज्ज्ञ व विद्यार्थ्यांना काय वाटते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात ...

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका सदस्याने विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नीट परीक्षा घेतली पाहिजे, अशी भूमिका काही शिक्षकांनी मांडली. बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवनशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांचाही विचार करण्याची गरज अधोरेखित केली. काही विद्यार्थ्यांनी नीट व सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

बॉक्स

तामिळनाडू सरकारने पारित केले विधेयक

नीट परीक्षेच्या कारणामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा घेऊ नये, असा पवित्रा तेथील राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या भूमिकेला पालक व विद्यार्थ्यांनी समर्थन दिले. विरोधी राजकीय पक्षही विधेयकाच्या बाजूने आहेत.

तामिळनाडू सरकारने नीट परीक्षेबाबत विधेयक पारित केल्याने तेथील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज उरली नाही. अशी जोरदार मागणीही त्या राज्यातील विद्यार्थी केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहेत.

कोट

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नीटचा अभ्यासक्रम आव्हानात्मक आहे.

मेडिकल शिक्षण महागडे आहे. मेडिकल प्रवेशासाठी बारावी परीक्षेच्या निकालावर गुणवत्तेची योग्य चाळणी होणार नाही. त्यामुळे नीट रद्द करायची असेल तर अशी एखादी परीक्षा राज्य स्तरावर बोर्डाच्या आधारावर घेतल्यास योग्यच होईल. यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

-विजय बदखल, संचालक, इन्सपायर, चंद्रपूर

कोट

आता स्पर्धा वाढली आहे. नीट परीक्षा घ्यायला हरकत नाही. मात्र, कोरोना काळाचा अपवादवगळता बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरही मेडिकलला प्रवेश देण्यास हरकत नाही.

-दिलीप झाडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, चंद्रपूर.

विद्यार्थी काय म्हणतात...

बारावीच्या आधारे मेडिकल प्रवेश दिला तर गुण तसेच आरक्षणाचा काही गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो.

- श्रीधर मालेकर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर

मेडिकल अभ्यासक्रमात प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी केवळ बारावीतील गुणांचा विचार करणे पुरेसे नाही.

-मालती कावळे, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर