शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

नीट न देता मेडिकल प्रवेश, तज्ज्ञ व विद्यार्थ्यांना काय वाटते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात ...

कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका सदस्याने विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नीट परीक्षा घेतली पाहिजे, अशी भूमिका काही शिक्षकांनी मांडली. बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवनशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांचाही विचार करण्याची गरज अधोरेखित केली. काही विद्यार्थ्यांनी नीट व सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

बॉक्स

तामिळनाडू सरकारने पारित केले विधेयक

नीट परीक्षेच्या कारणामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा घेऊ नये, असा पवित्रा तेथील राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या भूमिकेला पालक व विद्यार्थ्यांनी समर्थन दिले. विरोधी राजकीय पक्षही विधेयकाच्या बाजूने आहेत.

तामिळनाडू सरकारने नीट परीक्षेबाबत विधेयक पारित केल्याने तेथील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज उरली नाही. अशी जोरदार मागणीही त्या राज्यातील विद्यार्थी केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहेत.

कोट

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नीटचा अभ्यासक्रम आव्हानात्मक आहे.

मेडिकल शिक्षण महागडे आहे. मेडिकल प्रवेशासाठी बारावी परीक्षेच्या निकालावर गुणवत्तेची योग्य चाळणी होणार नाही. त्यामुळे नीट रद्द करायची असेल तर अशी एखादी परीक्षा राज्य स्तरावर बोर्डाच्या आधारावर घेतल्यास योग्यच होईल. यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

-विजय बदखल, संचालक, इन्सपायर, चंद्रपूर

कोट

आता स्पर्धा वाढली आहे. नीट परीक्षा घ्यायला हरकत नाही. मात्र, कोरोना काळाचा अपवादवगळता बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरही मेडिकलला प्रवेश देण्यास हरकत नाही.

-दिलीप झाडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, चंद्रपूर.

विद्यार्थी काय म्हणतात...

बारावीच्या आधारे मेडिकल प्रवेश दिला तर गुण तसेच आरक्षणाचा काही गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो.

- श्रीधर मालेकर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर

मेडिकल अभ्यासक्रमात प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी केवळ बारावीतील गुणांचा विचार करणे पुरेसे नाही.

-मालती कावळे, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर