शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

अनुदानित आश्रम शाळांवरच वक्रदृष्टी का?

By admin | Updated: July 13, 2016 02:05 IST

समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली.

इतर शाळांकडे डोळेझाक : शासनाचे धोरण भेदभाव करणारे पेंढरी (कोके) : समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली. ही बाब स्वागर्ताह आहे. मग शासनाला अनुदानित आश्रम शाळा बंद करुन साधायचं तरी काय? शासनाची सदर शाळेवरच वक्रदृष्टी का, असा प्रश्न विचारवंताना पडला आहे. प्रत्येक क्षेत्रातील आदिवासी, अल्पसंख्याक विमुक्त जाती- भटक्या जमाती, बहुजन, अनुसूचित जाती व इतर समाजातील विद्यार्थी घटक शिकला पाहिजे, शिकला तो टिकला. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी शासन सर्वस्तरावर धडपडतो आहे. मग आदिवासी, समाजकल्याण विभागाच्या आश्रम शाळा बंद करुन सदर जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे नव्हे काय, आधीच शासनाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर योजना बंद करुन आदिवासी विद्यार्थ्यांना उपेक्षित ठेवले आहे. यावर्षी शासनाने राज्यातील ७२ आदिवासी आश्रम (अनुदानित) शाळा बंद करून आदिवासी समाजाला धक्का दिला. त्यानंतर १ एप्रिल व ८ जून २०१६ अनुक्रमे समाजकल्याण व आदिवासी विभागाने चुकीचा ‘काम नाही, वेतना नाही’ (नो वर्क नो पेमेन्ट) चा जीआर काढून अतिरिक्त ठरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बंद केले. जोपर्यंत मान्यता गेलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे शासन समायोजन करीत नाही, तोपर्यंत त्यांचे वेतन बंदच राहणार आहे. मग सदर कर्मचारी व त्यांचे कुटुंब माती खाऊन जगणार काय, हा नियम जिल्हा परिषद प्राथमिक, खासगीे माध्यमिक, शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना का लागू नाही, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र होईपर्यंत त्यांना वेतन का देते, इतर शाळेकडे व कर्मचाऱ्यांकडे शासन डोळेझाक का करतो, असा आरोप शिक्षक संघाने केला आहे. शासनाने चुकीचा जीआर त्वरीत रद्द करावा अन्यथा शिक्षक संघटना आंदोलन करून उपोषणाला बसेल असा इशारा, कर्मचारी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)