शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अनुदानित आश्रम शाळांवरच वक्रदृष्टी का?

By admin | Updated: July 13, 2016 02:05 IST

समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली.

इतर शाळांकडे डोळेझाक : शासनाचे धोरण भेदभाव करणारे पेंढरी (कोके) : समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली. ही बाब स्वागर्ताह आहे. मग शासनाला अनुदानित आश्रम शाळा बंद करुन साधायचं तरी काय? शासनाची सदर शाळेवरच वक्रदृष्टी का, असा प्रश्न विचारवंताना पडला आहे. प्रत्येक क्षेत्रातील आदिवासी, अल्पसंख्याक विमुक्त जाती- भटक्या जमाती, बहुजन, अनुसूचित जाती व इतर समाजातील विद्यार्थी घटक शिकला पाहिजे, शिकला तो टिकला. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी शासन सर्वस्तरावर धडपडतो आहे. मग आदिवासी, समाजकल्याण विभागाच्या आश्रम शाळा बंद करुन सदर जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे नव्हे काय, आधीच शासनाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर योजना बंद करुन आदिवासी विद्यार्थ्यांना उपेक्षित ठेवले आहे. यावर्षी शासनाने राज्यातील ७२ आदिवासी आश्रम (अनुदानित) शाळा बंद करून आदिवासी समाजाला धक्का दिला. त्यानंतर १ एप्रिल व ८ जून २०१६ अनुक्रमे समाजकल्याण व आदिवासी विभागाने चुकीचा ‘काम नाही, वेतना नाही’ (नो वर्क नो पेमेन्ट) चा जीआर काढून अतिरिक्त ठरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बंद केले. जोपर्यंत मान्यता गेलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे शासन समायोजन करीत नाही, तोपर्यंत त्यांचे वेतन बंदच राहणार आहे. मग सदर कर्मचारी व त्यांचे कुटुंब माती खाऊन जगणार काय, हा नियम जिल्हा परिषद प्राथमिक, खासगीे माध्यमिक, शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना का लागू नाही, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र होईपर्यंत त्यांना वेतन का देते, इतर शाळेकडे व कर्मचाऱ्यांकडे शासन डोळेझाक का करतो, असा आरोप शिक्षक संघाने केला आहे. शासनाने चुकीचा जीआर त्वरीत रद्द करावा अन्यथा शिक्षक संघटना आंदोलन करून उपोषणाला बसेल असा इशारा, कर्मचारी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)