शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मर्यादित संख्येमुळे लग्नसोहळे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर ...

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर समारंभात केवळ ५० जणांनाच परवानगी देण्यात येत आहे. यापेक्षा अधिक नागरिक उपस्थित असेल तर संबंधित मंगल कार्यालय, लाॅन संचालकावर आणि आयोजकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे, त्यामुळे लग्न समारंभ करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस, महसूल प्रशासन, महापालिका कर्मचारी मंगल कार्यालय, लाॅनला भेटी देत असून, दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न सध्या वधू-वर पित्यांसह मंगल कार्यालय संचालकांनाही पडला आहे.

बाॅक्स

अशाही काही गमती-जमती

मागील काही दिवसांपासून एक मॅसेज वायरल होत आहे. यामध्ये एक मंगल कार्यालय मालक आमच्याकडे फक्त तुमचा मुलगी आणि मुलगा पाठवा, आम्ही लग्न लावून देऊ, कारण ५० जणांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आचारी व त्याचे लोक १० जण, बँडवाले १०, वाढणारी १०, कार्यालय स्टाप १०, भटजी १, घोडेवाला १, रांगोळीवाला २, डेकोरेशन ३ आणि कार्यालय मालक असे एकूण ४८ जणांची लिस्ट असून, उर्वरित दोघांमध्ये नवरदेव-नवरी असे ५० जण होत असल्याचे या मॅसेजमध्ये म्हटले आहे. हा मॅसेज मागील काही दिवसांपासून तुफान व्हायरल होत आहे.

बाॅक्स

ॲक्टिव रुग्ण -२६९

एकूण बाधित २३६०४

एकूण मृत्यू ३९८

मास्क न लावता फिरणऱ्यांवर

१३ लाख ३९ हजार दंड