शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

संचारबंदीमुळे लग्न सोहळे पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित केले होते. मात्र, आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लग्न सोहळेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, २५ जणांच्या उपस्थितीत कसा विवाह होईल, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही पुन्हा मंगल कार्यालय संचालक तसेच यावर अवलंबून असलेले सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८ हजारांवर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ५५०च्या वर रुग्णांचा बळी गेला आहे.

राज्यभरात वाढलेली रुग्णसंख्या बघता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, काही कुटुंबीयांनी यापूर्वीच विवाह जुळून ठेवत सर्वच तयारी केली आहे. एवढेच नाही तर मंगल कार्यालय, कॅटर्स संचालक तसेच इतरांनाही ॲडव्हान्स देऊन बुक केले आहे. मात्र, आता काय करायचे या विवंचनेत वधू-वरांकडील मंडळी पडली आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हाही अनेक कुटुंबीयांनी आपल्याकडील विवाह सोहळे रद्द केले होते. त्यानंतर दिवाळीनंतर कोरोना संकट काही प्रमाणात घटल्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. यामुळे अडचणीत आलेले मंगल कार्यालय संचालक तसेच त्यावर अवलंबून असलेले इतरही घटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकट असतानाही मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे पुन्हा सर्व व्यावसायिक अडचणीत आले असून विवाह असलेल्या कुटुंबीयांचीही चिंंता वाढली आहे.

बाॅक्स

कर्जाचा डोंगर वाढला

जिल्ह्यात विविध लाॅन, मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेऊन सुसज्ज मंगल कार्यालयांचे बांधकाम केले आहे. मात्र, आता लग्न समारंभरच होत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यावर अवलंबून असलेले इतरही घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.