शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे लग्न सोहळे पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित केले होते. मात्र, आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लग्न सोहळेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, २५ जणांच्या उपस्थितीत कसा विवाह होईल, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही पुन्हा मंगल कार्यालय संचालक तसेच यावर अवलंबून असलेले सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८ हजारांवर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ५५०च्या वर रुग्णांचा बळी गेला आहे.

राज्यभरात वाढलेली रुग्णसंख्या बघता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, काही कुटुंबीयांनी यापूर्वीच विवाह जुळून ठेवत सर्वच तयारी केली आहे. एवढेच नाही तर मंगल कार्यालय, कॅटर्स संचालक तसेच इतरांनाही ॲडव्हान्स देऊन बुक केले आहे. मात्र, आता काय करायचे या विवंचनेत वधू-वरांकडील मंडळी पडली आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हाही अनेक कुटुंबीयांनी आपल्याकडील विवाह सोहळे रद्द केले होते. त्यानंतर दिवाळीनंतर कोरोना संकट काही प्रमाणात घटल्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. यामुळे अडचणीत आलेले मंगल कार्यालय संचालक तसेच त्यावर अवलंबून असलेले इतरही घटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकट असतानाही मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे पुन्हा सर्व व्यावसायिक अडचणीत आले असून विवाह असलेल्या कुटुंबीयांचीही चिंंता वाढली आहे.

बाॅक्स

कर्जाचा डोंगर वाढला

जिल्ह्यात विविध लाॅन, मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेऊन सुसज्ज मंगल कार्यालयांचे बांधकाम केले आहे. मात्र, आता लग्न समारंभरच होत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यावर अवलंबून असलेले इतरही घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.