शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

संचारबंदीमुळे लग्न सोहळे पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित केले होते. मात्र, आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लग्न सोहळेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, २५ जणांच्या उपस्थितीत कसा विवाह होईल, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही पुन्हा मंगल कार्यालय संचालक तसेच यावर अवलंबून असलेले सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८ हजारांवर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ५५०च्या वर रुग्णांचा बळी गेला आहे.

राज्यभरात वाढलेली रुग्णसंख्या बघता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, काही कुटुंबीयांनी यापूर्वीच विवाह जुळून ठेवत सर्वच तयारी केली आहे. एवढेच नाही तर मंगल कार्यालय, कॅटर्स संचालक तसेच इतरांनाही ॲडव्हान्स देऊन बुक केले आहे. मात्र, आता काय करायचे या विवंचनेत वधू-वरांकडील मंडळी पडली आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हाही अनेक कुटुंबीयांनी आपल्याकडील विवाह सोहळे रद्द केले होते. त्यानंतर दिवाळीनंतर कोरोना संकट काही प्रमाणात घटल्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. यामुळे अडचणीत आलेले मंगल कार्यालय संचालक तसेच त्यावर अवलंबून असलेले इतरही घटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकट असतानाही मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे पुन्हा सर्व व्यावसायिक अडचणीत आले असून विवाह असलेल्या कुटुंबीयांचीही चिंंता वाढली आहे.

बाॅक्स

कर्जाचा डोंगर वाढला

जिल्ह्यात विविध लाॅन, मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेऊन सुसज्ज मंगल कार्यालयांचे बांधकाम केले आहे. मात्र, आता लग्न समारंभरच होत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यावर अवलंबून असलेले इतरही घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.