शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

संचारबंदीमुळे लग्न सोहळे पुन्हा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित केले होते. मात्र, आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लग्न सोहळेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, २५ जणांच्या उपस्थितीत कसा विवाह होईल, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही पुन्हा मंगल कार्यालय संचालक तसेच यावर अवलंबून असलेले सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत.

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८ हजारांवर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ५५०च्या वर रुग्णांचा बळी गेला आहे.

राज्यभरात वाढलेली रुग्णसंख्या बघता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, काही कुटुंबीयांनी यापूर्वीच विवाह जुळून ठेवत सर्वच तयारी केली आहे. एवढेच नाही तर मंगल कार्यालय, कॅटर्स संचालक तसेच इतरांनाही ॲडव्हान्स देऊन बुक केले आहे. मात्र, आता काय करायचे या विवंचनेत वधू-वरांकडील मंडळी पडली आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हाही अनेक कुटुंबीयांनी आपल्याकडील विवाह सोहळे रद्द केले होते. त्यानंतर दिवाळीनंतर कोरोना संकट काही प्रमाणात घटल्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. यामुळे अडचणीत आलेले मंगल कार्यालय संचालक तसेच त्यावर अवलंबून असलेले इतरही घटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकट असतानाही मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे पुन्हा सर्व व्यावसायिक अडचणीत आले असून विवाह असलेल्या कुटुंबीयांचीही चिंंता वाढली आहे.

बाॅक्स

कर्जाचा डोंगर वाढला

जिल्ह्यात विविध लाॅन, मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेऊन सुसज्ज मंगल कार्यालयांचे बांधकाम केले आहे. मात्र, आता लग्न समारंभरच होत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यावर अवलंबून असलेले इतरही घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.