शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उपेक्षित समाजालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:40 IST

मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी निवडणुकात वंचित बहुजन समाजाला भूलथापा देणाऱ्या राजकीय पक्षांना सत्तेतून उलथून टाकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.चिमूर येथील बी.पी.एड.कॉलेज मैदानात आयोजित धनगर, माना, हलबा, ढिवर समाजाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर धनगर समाजाचे नेते आमदारहरिभाऊ भदे, माना समाजाचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. रामेशकुमार गजभे, मच्छीमार संघर्ष समितीचे संयोजक माजी न्या. चंद्रलाल मेश्राम, आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, धनराज वंजारी, भारिपचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा अध्यक्ष जयदीप खोब्रागडे ,के एल नान्हे, अनमोल शेंडे, मेळाव्याचे संयोजक अरविंद सांदेकर उपस्थित होते. पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजप सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्तेत येण्याच्या प्रयत्न करीत असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वासुदेव श्रीरामे, संचालन प्रा. दिनकर चौधरी यांनी केले.