शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.

ठळक मुद्देनिवृत्त जवानांच्या आठवणी : देशसेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार जवानांचे योगदान

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘आमचे काम अत्यंत अवघड होते. आम्ही जिथे कार्यरत होतो तो भाग म्हणजे हाडे गोठविणारा थंड प्रदेश. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण केले. शत्रूकडून गोळ्यांचा वर्षाव झाला तरी ठाणे सोडले नाही. आपला सहकारी शहीद झाल्याचे दु:ख मनात दडवून शत्रुवर चाल करणे हेच आमचे जीवनध्येय’ हे निवृत्त जवानांचे प्रतिनिधिनिक मनोगत ऐकले की ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या ओळीची स्वातंत्र्यदिनी आठवण पुढे येते.भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ हा नारा दिला. जनमानसाची पकड घेणाऱ्या या नाऱ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच स्वातंत्र्यानंतर देशसेवा करणाऱ्या जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ंह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची इतिहासाने नोंदही घेतली आहे. देशसेवा करून जिल्ह्यातील १ हजार १८८ जवान निवृत्तीचे जीवन जगत आहेत. आतापर्यंत सुमारे अडिच हजारहून जास्त भूमिपूत्रांनी देशसेवा केली. देशसेवेत अमुल्य योगदान देणारे सुभेदार शंकर नेंगरे हे शौर्यचक्र पुरस्काराचे मानकरी आहेत.जिल्ह्यात दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ३२७ आहे. सैन्य दलातील जवानांच्या दोन वीरमाताही आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली.सेवारत जवानांची व्हावी नोंददेशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.भारतीय सैन्यात वाढावा जिल्ह्याचा टक्कासैन्यातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या १ हजार १८८ आहे. युवक-युवतींनी सैन्यात जावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील युवक-युवतींचा सैन्य दलातील टक्का वाढला नाही.निवृत्त सैनिकांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शिवाय, युवक-युवतींनी सैन्यदलात जावून देशसेवा करावी, याकरिताही मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील कार्यरत जवानांची नोंद या कार्यालयात होत नाही.- दिनेशकुमार गोवारे,जनमाहिती अधिकारीजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन