शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.

ठळक मुद्देनिवृत्त जवानांच्या आठवणी : देशसेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार जवानांचे योगदान

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘आमचे काम अत्यंत अवघड होते. आम्ही जिथे कार्यरत होतो तो भाग म्हणजे हाडे गोठविणारा थंड प्रदेश. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण केले. शत्रूकडून गोळ्यांचा वर्षाव झाला तरी ठाणे सोडले नाही. आपला सहकारी शहीद झाल्याचे दु:ख मनात दडवून शत्रुवर चाल करणे हेच आमचे जीवनध्येय’ हे निवृत्त जवानांचे प्रतिनिधिनिक मनोगत ऐकले की ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या ओळीची स्वातंत्र्यदिनी आठवण पुढे येते.भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ हा नारा दिला. जनमानसाची पकड घेणाऱ्या या नाऱ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच स्वातंत्र्यानंतर देशसेवा करणाऱ्या जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ंह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची इतिहासाने नोंदही घेतली आहे. देशसेवा करून जिल्ह्यातील १ हजार १८८ जवान निवृत्तीचे जीवन जगत आहेत. आतापर्यंत सुमारे अडिच हजारहून जास्त भूमिपूत्रांनी देशसेवा केली. देशसेवेत अमुल्य योगदान देणारे सुभेदार शंकर नेंगरे हे शौर्यचक्र पुरस्काराचे मानकरी आहेत.जिल्ह्यात दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ३२७ आहे. सैन्य दलातील जवानांच्या दोन वीरमाताही आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली.सेवारत जवानांची व्हावी नोंददेशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.भारतीय सैन्यात वाढावा जिल्ह्याचा टक्कासैन्यातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या १ हजार १८८ आहे. युवक-युवतींनी सैन्यात जावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील युवक-युवतींचा सैन्य दलातील टक्का वाढला नाही.निवृत्त सैनिकांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शिवाय, युवक-युवतींनी सैन्यदलात जावून देशसेवा करावी, याकरिताही मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील कार्यरत जवानांची नोंद या कार्यालयात होत नाही.- दिनेशकुमार गोवारे,जनमाहिती अधिकारीजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन