शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.

ठळक मुद्देनिवृत्त जवानांच्या आठवणी : देशसेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार जवानांचे योगदान

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘आमचे काम अत्यंत अवघड होते. आम्ही जिथे कार्यरत होतो तो भाग म्हणजे हाडे गोठविणारा थंड प्रदेश. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण केले. शत्रूकडून गोळ्यांचा वर्षाव झाला तरी ठाणे सोडले नाही. आपला सहकारी शहीद झाल्याचे दु:ख मनात दडवून शत्रुवर चाल करणे हेच आमचे जीवनध्येय’ हे निवृत्त जवानांचे प्रतिनिधिनिक मनोगत ऐकले की ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या ओळीची स्वातंत्र्यदिनी आठवण पुढे येते.भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ हा नारा दिला. जनमानसाची पकड घेणाऱ्या या नाऱ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच स्वातंत्र्यानंतर देशसेवा करणाऱ्या जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ंह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची इतिहासाने नोंदही घेतली आहे. देशसेवा करून जिल्ह्यातील १ हजार १८८ जवान निवृत्तीचे जीवन जगत आहेत. आतापर्यंत सुमारे अडिच हजारहून जास्त भूमिपूत्रांनी देशसेवा केली. देशसेवेत अमुल्य योगदान देणारे सुभेदार शंकर नेंगरे हे शौर्यचक्र पुरस्काराचे मानकरी आहेत.जिल्ह्यात दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ३२७ आहे. सैन्य दलातील जवानांच्या दोन वीरमाताही आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली.सेवारत जवानांची व्हावी नोंददेशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.भारतीय सैन्यात वाढावा जिल्ह्याचा टक्कासैन्यातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या १ हजार १८८ आहे. युवक-युवतींनी सैन्यात जावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील युवक-युवतींचा सैन्य दलातील टक्का वाढला नाही.निवृत्त सैनिकांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शिवाय, युवक-युवतींनी सैन्यदलात जावून देशसेवा करावी, याकरिताही मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील कार्यरत जवानांची नोंद या कार्यालयात होत नाही.- दिनेशकुमार गोवारे,जनमाहिती अधिकारीजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन