शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

तेजस्विनी प्रकल्प गुंडाळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 3, 2015 00:47 IST

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ...

४० सहयोगिनींवर गंडांतर : शासनाने लक्ष द्यावेचंद्रपूर : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प निधीअभावी गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ४० तर विदर्भातील ४०० सहयोगिनींवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे महिलांच्या बचत गटाच्या बळकटीकरणाकरिता तेजस्विनी हा प्रकल्प २००७ या वर्षीपासून राज्यात चालविला जात आहे. आठ वर्षांसाठी हा प्रकल्प होता. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहयोगिनींची ११ महिन्याच्या करारतत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. सात वर्षापासून राज्यात १४००, विदर्भात ४०० तर जिल्ह्यात ४० महिला, युवती या प्रकल्पात काम करीत आहे. २०१५ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्याने हा प्रकल्पच गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे निधी नसल्याचे कारण महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढे केले आहे. परंतु, मागील सात वर्षांपासून या प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच महिला आर्थिक विकास महामंडळ नवी जाहिरात काढून काही जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे जुन्या सहयोगिनी काढून नव्यांना संधी मिळणार असल्याने सात वर्षांपासून प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींमध्ये रोष निर्माण झाला आहे. यातील अनेक सहयोगिनी विवाहित असून त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, अशा परिस्थितीत त्यांना कामावरुन काढले तर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जुन्या सहयोगिनींनाच प्रकल्पात सामावून घ्यावे अन्यथा ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सहयोगिनींची नियुक्ती करुन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सहयोगिनींनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बसस्थानक परिसरात दुर्गंधीचे वातावरणवरोरा : येथील बसस्थानक तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. हे स्थानक सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून स्वच्छतागृहातही घाणीचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार होत आहे.या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)