शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दंडार नाट्य लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 14, 2015 01:14 IST

दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे.

लोककला जपण्याची गरज : तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक ठेवा नष्टनवरगाव : दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे. दंडार ही लोककलेचा भाग असून १५ वर्षापूूर्वी ग्रामीण भागात दंडारीचे सादरीकरण सणासुदीच्या वेळेत गावागावात होत असे. मात्र आज ही लोककला एखाद्यावेळेस पाहावयास मिळते. हळूहळू ती लोप पावत आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने रत्नापूर हेटी (इंदिरानगर) येथील श्री बाल दंडार मंडळाने ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या दंडारीचे सादरीकरण करुन लुप्त होत चाललेल्या दंडारीची रसिकांना दिवाळी भेट दिली.दंडारीत स्त्री पात्राचे काम पुरुषाला करावे लागते. दंडार ढोकली, तुनतुने, टाळ यासारख्या वाद्यांच्या निनादात सादर केली जाते. पात्रांच्या बोलण्याच्या वाक्यापेक्षा गाण्यांचीच भर मोठ्या प्रमाणात असते. एक- दोन महिने तालीम करुन दंडारीचे सादरीकरण केले जाते. पंधरा- वीस वर्षांपूर्वी दंडार मंडळे अस्तित्वात होती. सणासुदीला दंडारीचे प्रयोग विरंगुळा म्हणून सादर केले जायचे. मात्र काळानुरुप मनोरंजनाच्या कार्यक्रमात तंत्रज्ञानाची वेगळीच भर पडल्यामुळे दंडारीचे प्रयोग कमी झाले. आजच्या युगात टीव्ही, चित्रपट यासारख्या विविध माध्यमांची भर पडत गेल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यामुळे दंडार काळानुरुप काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.दंडार म्हटले की, रात्री ८ ते ९ वाजता सुरु झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालत असे. या दंडारीला मुख्यत्वे करुन महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित होता. दंडारीच्या माध्यमातून रामायण, महाभारत, राजा- राणीच्या विषयावरील ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केल्या जायचे. यासोबतच संगीत नाटकाचे सादरीकरणही ग्रामीण भागात होत होते.आज संगीत नाटकही काळानुरुप लोप पावत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दंडारीला मनोरंजनाचे साधन समजले जात असले तरी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. परंतु ही लोककला आज लोप पावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या दिवशी रत्नापूर हेटी (इंदिरानगर) यथील श्री बाल दंडार मंडळातील युवकांनी ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या सामाजिक विषयावरील दंडारीचे सादरीकरण करुन संस्कृतीचा ठेवा जपल्याचे दिसून आले. (वार्ताहर)