शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

दंडार नाट्य लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 14, 2015 01:14 IST

दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे.

लोककला जपण्याची गरज : तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक ठेवा नष्टनवरगाव : दंडार, नाटक, भारुड, पोवाडा यासारख्या मनोरंजनाचे साधन समजल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण पूर्वी गावोगावी केले जायचे. दंडार ही लोककलेचा भाग असून १५ वर्षापूूर्वी ग्रामीण भागात दंडारीचे सादरीकरण सणासुदीच्या वेळेत गावागावात होत असे. मात्र आज ही लोककला एखाद्यावेळेस पाहावयास मिळते. हळूहळू ती लोप पावत आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने रत्नापूर हेटी (इंदिरानगर) येथील श्री बाल दंडार मंडळाने ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या दंडारीचे सादरीकरण करुन लुप्त होत चाललेल्या दंडारीची रसिकांना दिवाळी भेट दिली.दंडारीत स्त्री पात्राचे काम पुरुषाला करावे लागते. दंडार ढोकली, तुनतुने, टाळ यासारख्या वाद्यांच्या निनादात सादर केली जाते. पात्रांच्या बोलण्याच्या वाक्यापेक्षा गाण्यांचीच भर मोठ्या प्रमाणात असते. एक- दोन महिने तालीम करुन दंडारीचे सादरीकरण केले जाते. पंधरा- वीस वर्षांपूर्वी दंडार मंडळे अस्तित्वात होती. सणासुदीला दंडारीचे प्रयोग विरंगुळा म्हणून सादर केले जायचे. मात्र काळानुरुप मनोरंजनाच्या कार्यक्रमात तंत्रज्ञानाची वेगळीच भर पडल्यामुळे दंडारीचे प्रयोग कमी झाले. आजच्या युगात टीव्ही, चित्रपट यासारख्या विविध माध्यमांची भर पडत गेल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यामुळे दंडार काळानुरुप काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.दंडार म्हटले की, रात्री ८ ते ९ वाजता सुरु झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालत असे. या दंडारीला मुख्यत्वे करुन महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवित होता. दंडारीच्या माध्यमातून रामायण, महाभारत, राजा- राणीच्या विषयावरील ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केल्या जायचे. यासोबतच संगीत नाटकाचे सादरीकरणही ग्रामीण भागात होत होते.आज संगीत नाटकही काळानुरुप लोप पावत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दंडारीला मनोरंजनाचे साधन समजले जात असले तरी हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. परंतु ही लोककला आज लोप पावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या दिवशी रत्नापूर हेटी (इंदिरानगर) यथील श्री बाल दंडार मंडळातील युवकांनी ‘खेळ मांडला मामाने, डाव जिंकला भाच्याने’ या सामाजिक विषयावरील दंडारीचे सादरीकरण करुन संस्कृतीचा ठेवा जपल्याचे दिसून आले. (वार्ताहर)