शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने नागभीडचे रस्ते गिळंकृत होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 7, 2015 05:13 IST

नागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे

घनश्याम नवघडे ल्ल नागभीडनागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे नागभीडरांना रस्त्यांनी चालणेही कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे येथील ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व विविध प्रकारची खरेदी करत असतात. पण या हजारो नागरिकांना आणि नागभीडकरांना सावावून घेण्याची क्षमताच येथील रस्ते हरवून बसले आहेत, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ असलेला हा रस्ता कृत्रिम अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानाच्या मालकांनी आपल्या दुकानांसमोर नाल्यांवर छत टाकून सामानासाठी अतिक्रमण केले आहे. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यांवर उभी करीत असल्याने चार चाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही. भरीस भर म्हणजे याच रस्त्याने नागभीड येथील मोठ्या व्यापाऱ्यांच्या मार्ग काढण्यासाठी १५ ते २० मिनीट कसरत करावी लागते. अशावेळी अनेकदा तर अपघाताची शक्यताही निर्माण होत असते.विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. लोक सांगतात पूर्वी या रस्त्याने मोठी वाहने चालायची. आता येथून छोटी कारसुद्धा चालत नाही. संपूर्ण रस्ताच गिळंकृत झाला आहे. नागभीडचा आणखी एक रहदारीचा रस्ता म्हणजे गोरोबा चौकातून राममंदिर चौकात निघणारा रस्ता आणि जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राममंदिर चौकात निघणारा रस्तासुद्धा अतिशय महत्वाचा आहे. या दोन्ही रस्त्यांना चांगलीच रहदारी असते. पण हे दोन्ही रस्ते एवढे अरुंद झाले ओहत की, मिनिडोअरसारखी दोन वाहने परस्परांसमोर आली तर त्यांना वाट काढणे कठीण होऊन जाते. अशावेळी साधे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक ताटकळत राहावे लागते.ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. नागभीडच्या बहुतेक प्रत्येक रस्त्यांची स्थिती याहून वेगळी नाही. आणि म्हणूनच नागभीडच्या ग्रामपंचायतीने या रस्त्यांबाबत मनन आणि चिंतन करणे गरजेचे आहे.हे अतिक्रमण आजचे नाही. अनेक वर्षापासूनचे आहे. आम्ही नवीन आहोत, तरीपण सर्व सदस्यांना विचारात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.- विनय शेंडे, सरपंच, ग्रा.पं. नागभीडनागभीडच्या प्रमुख रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण ही खरोखरच चिंतेची बाब आहे. ग्रामपंचायतीने कार्यदेशीर प्रक्रिया पार पाडून हे अतिक्रमण हटविण्यास काहीच हरकत नाही, आमचे सहकार्य असेल.- विजय अमृतकर, गटनेता काँग्रेस पक्ष व सदस्य ग्रा.पं. नागभीड