शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अतिक्रमणाने नागभीडचे रस्ते गिळंकृत होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 7, 2015 05:13 IST

नागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे

घनश्याम नवघडे ल्ल नागभीडनागभीडच्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण आणि सर्रास होत असलेली जडवाहतूक यामुळे नागभीडरांना रस्त्यांनी चालणेही कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे येथील ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व विविध प्रकारची खरेदी करत असतात. पण या हजारो नागरिकांना आणि नागभीडकरांना सावावून घेण्याची क्षमताच येथील रस्ते हरवून बसले आहेत, असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ असलेला हा रस्ता कृत्रिम अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानाच्या मालकांनी आपल्या दुकानांसमोर नाल्यांवर छत टाकून सामानासाठी अतिक्रमण केले आहे. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यांवर उभी करीत असल्याने चार चाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही. भरीस भर म्हणजे याच रस्त्याने नागभीड येथील मोठ्या व्यापाऱ्यांच्या मार्ग काढण्यासाठी १५ ते २० मिनीट कसरत करावी लागते. अशावेळी अनेकदा तर अपघाताची शक्यताही निर्माण होत असते.विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही. लोक सांगतात पूर्वी या रस्त्याने मोठी वाहने चालायची. आता येथून छोटी कारसुद्धा चालत नाही. संपूर्ण रस्ताच गिळंकृत झाला आहे. नागभीडचा आणखी एक रहदारीचा रस्ता म्हणजे गोरोबा चौकातून राममंदिर चौकात निघणारा रस्ता आणि जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून राममंदिर चौकात निघणारा रस्तासुद्धा अतिशय महत्वाचा आहे. या दोन्ही रस्त्यांना चांगलीच रहदारी असते. पण हे दोन्ही रस्ते एवढे अरुंद झाले ओहत की, मिनिडोअरसारखी दोन वाहने परस्परांसमोर आली तर त्यांना वाट काढणे कठीण होऊन जाते. अशावेळी साधे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक ताटकळत राहावे लागते.ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. नागभीडच्या बहुतेक प्रत्येक रस्त्यांची स्थिती याहून वेगळी नाही. आणि म्हणूनच नागभीडच्या ग्रामपंचायतीने या रस्त्यांबाबत मनन आणि चिंतन करणे गरजेचे आहे.हे अतिक्रमण आजचे नाही. अनेक वर्षापासूनचे आहे. आम्ही नवीन आहोत, तरीपण सर्व सदस्यांना विचारात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.- विनय शेंडे, सरपंच, ग्रा.पं. नागभीडनागभीडच्या प्रमुख रस्त्यांवर वाढत चाललेले अतिक्रमण ही खरोखरच चिंतेची बाब आहे. ग्रामपंचायतीने कार्यदेशीर प्रक्रिया पार पाडून हे अतिक्रमण हटविण्यास काहीच हरकत नाही, आमचे सहकार्य असेल.- विजय अमृतकर, गटनेता काँग्रेस पक्ष व सदस्य ग्रा.पं. नागभीड