शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जंगलातील पाणवठे आटले

By admin | Updated: March 13, 2016 01:08 IST

जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी ...

वनविभागाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती मूल : जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सतत वाढणारे तापमान बघता पाणवठे तग धरू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.वाढणाऱ्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होण्याची दाट शक्यता असून त्यात शिकारीसुद्धा वन्यप्राण्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.मूल तालुक्यात चार वनविभागाचा कारभार चालतो. यात ताडोबा अंधारी प्रकल्पातील बफर झोन परिक्षेत्र, चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र, वनविकास महामंडळ तसेच विशेष संरक्षण दलाचे कार्यालयसुद्धा याच तालुक्यात आहे. चार वनविभागाचा कारभार या तालुक्यात चालत असल्याने वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात संवेदनशील नसल्याचे जाणवते. जंगलात काही प्रमाणात अवैध वृक्षतोड वनविभागाच्या डोळ्यात धूळ झोकून केली जाते. तसेच वन्यप्राण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजना पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होत नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी ज्या ठिकाणी विद्युत नाही अशा घनदाट जंगलात सौर उर्जेवर चालणारे हातपंप बसवून पाणवठ्यावर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष न घातल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येते. वन्यप्राण्यासाठी वनदान ठरू पाहणाऱ्या विविध योजनांचा लाभ मूल बफर झोन, वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली, वनविभाग महामंडळ व विशेष व्याघ्र संरक्षण दलानी लक्ष घातले तर वन्यप्राण्यांना संजीवनी मिळेल. (तालुका प्रतिनिधी)