शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

जंगलातील पाणवठे आटले

By admin | Updated: March 13, 2016 01:08 IST

जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी ...

वनविभागाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती मूल : जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सतत वाढणारे तापमान बघता पाणवठे तग धरू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.वाढणाऱ्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होण्याची दाट शक्यता असून त्यात शिकारीसुद्धा वन्यप्राण्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.मूल तालुक्यात चार वनविभागाचा कारभार चालतो. यात ताडोबा अंधारी प्रकल्पातील बफर झोन परिक्षेत्र, चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र, वनविकास महामंडळ तसेच विशेष संरक्षण दलाचे कार्यालयसुद्धा याच तालुक्यात आहे. चार वनविभागाचा कारभार या तालुक्यात चालत असल्याने वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात संवेदनशील नसल्याचे जाणवते. जंगलात काही प्रमाणात अवैध वृक्षतोड वनविभागाच्या डोळ्यात धूळ झोकून केली जाते. तसेच वन्यप्राण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजना पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होत नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी ज्या ठिकाणी विद्युत नाही अशा घनदाट जंगलात सौर उर्जेवर चालणारे हातपंप बसवून पाणवठ्यावर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष न घातल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येते. वन्यप्राण्यासाठी वनदान ठरू पाहणाऱ्या विविध योजनांचा लाभ मूल बफर झोन, वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली, वनविभाग महामंडळ व विशेष व्याघ्र संरक्षण दलानी लक्ष घातले तर वन्यप्राण्यांना संजीवनी मिळेल. (तालुका प्रतिनिधी)