शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पोंभुर्णा तालुक्यात जलजन्य आजार बळावले

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजार बळावत आहे

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नळाद्वारे दूषित पिण्याचा पुरवठानीळकंठ नैताम  पोंभूर्णातालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजार बळावत आहे. त्यातून तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पोंभूर्णा येथील वॉर्ड क्रमांक चारमध्ये गेल्या एक महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांना जलजन्य व काविळासारख्या आजाराने पछाडले आहे. काही रुग्ण उपचारासाठी चंद्रपूर येथे जात आहेत. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. नदी-नाल्याकाठी असलेल्या विहीरीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना दिल्या जाते. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ते पाणी गढूळ व दूषित झाले आहे. या पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्याने ग्रामस्थांना विविध जलजन्य आजाराला बळी जावे लागत आहे. पोंभूर्णा येथील ५० ते ६० नागरिकांना काविळ या आजाराने ग्रासले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. अनेक गावांतून बरेच रुग्ण पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असल्याने येथील आरोग्य केंद्र दिवसभर गर्दीने फुलून असते. उलटी होणे, डोके दुखणे, काविळ आदी जलजन्य आजारात वाढ होत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून फवारणीकडे दुर्लक्षगावातील घाण आणि डबके यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यापासून आजाराची लागण झाल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. यासाठी शासनाने काही गावाच्या मागे एक फायलेरिया कर्मचारी ठेवलेला आहे. गाव परिसरातील नाल्यातील डासांची पैदास नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. परंतु सदर फायलेरिया कर्मचारी गावामध्ये कधी फवारणी करताना दिसत नाहीत. ते वर्षभर कोणते काम करतात, हेदेखील एक कोडेच आहे. वरिष्ठांचेसुद्धा त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने ते काम न करता वेतन मात्र घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे गावामध्ये डासाची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकांना विविध आजार होत असल्याचे चित्र दरवर्षी पहायला मिळते.फॉगिंग मशीन धूळ खातपंचायत समितीस्तरावरून अनेक ग्रामपंचायतींना शासनामार्फत डासाच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉगिंग मशीन फवारणीसाठी दिल्या आहेत. परंतु त्या मशीनचा वापर कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये होत नसल्याचे दिसते. एखादा आजार किंवा साथीचे तिव्ररूप धारण करून कुणी मृत्यू झाल्यास संबंधित ग्रामपंचायती त्या मशीनचा वापर करण्यासाठी लक्ष केंद्रीत करीत असतात. आजारात वाढ झाल्याने ते नियंत्रणात आणणे मात्र मग कठीण झाले असते. मुनगंटीवारांनी लक्ष घालावेपोंभुर्णा तालुका परिसरातील क्षेत्रामधून सुधीर मुनगंटीवार सलग तिनदा निवडून आलेत. आज ते मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी त्यांनी सत्तेत आपला पक्ष आल्यास स्वच्छ प्रशासन देऊ, असे अनेकदा जाहीर सभांमधून सांगितले. विकासाकडे लक्ष देणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. म्हणूनच त्यांना वित्त मंत्र्याचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. आता तर त्यांचेच सरकार सत्तेवर आहे. मग कुठे गेले स्वच्छ प्रशासन? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक गावांत दूषित पाणी मिळते ही नित्याचीच बाब असून याकडे ना.मुनगंटीवारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये दिवसेंदिवस जलजन्य आजारांत वाढ होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने जलजन्य आजारात वाढ होत आहे. अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येत आहेत. आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांच्या मार्फत प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायतीअंतर्गत दिवंडी देऊन पाणी उकळून, गाळून पिण्याबाबतच्या सुचना स्थानिक नागरिकांना दिल्या जात आहेत.- डॉ. विलास धनगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोंभूर्णा